शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Hartalika Puja Vrat : ‘लव्ह मॅरेज’च्या जमान्यात हरतालिका व्रत कशासाठी?... समजून घ्या महती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 11:07 IST

Hartalika Puja Vrat : हिमालय राजाची कन्या म्हणजे हरतालिका. वडिलांनी विवाहाच्या बाबतीत मुलीचा विचार न घेता जोडीदार निवडण्याचा तो काळ. याच परंपरेला छेद दिला या हिमकन्या पार्वतीने. तिचे लग्न ठरले होते, श्रीविष्णूंशी. पण, पार्वतीच्या मनात काही वेगळेच होते.

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

आज हरतालिका. कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मोजन्मी मनासारखा पती (जोडीदार) मिळावा किंवा मिळालेला पती (हूकूमशहा नव्हे,सहकारी,तीची व कुटुंबाची काळजी घेणारा) मनासारखा वागावा, हीच मनीषा धरून कडक, उपवास करून हरतालिका व तिच्या सखीची पूजा करण्याचा दिवस.

हिमालय राजाची ही कन्या म्हणजे हरतालिका. वडिलांनी विवाहाच्या बाबतीत मुलीचा विचार न घेता जोडीदार निवडण्याचा तो काळ. आता या कलियुगात तोच विचार उलटा झाला. मुला-मुलींनी विवाहाच्या बाबतीत वडिलांचा विचार न घेता जोडीदार निवडण्याचा. आधी लव्ह मग मॅरेज. पूर्वी आधी मॅरेज, मग लव्ह असा पायंडा होता. पालकच आपल्या मुलामुलींचे हित कशात आहे, ते जाणत व विचारपूर्वक निर्णय घेत. त्यामुळे संसार सुखाचे-समृद्धीचे-समाधानाचे होते. त्यामुळे मुलगी किंवा मुलगा जोडीदाराच्या गळ्यात निमूटपणे हार टाकून मोकळे होई.

परंतु, याच परंपरेला छेद दिला या हिमकन्या पार्वतीने. तिचे लग्न ठरले होते, श्रीविष्णूंशी. पृथ्वीचा पालनकर्ता, त्रैलोक्याचा राजा, सुंदर, लोकप्रिय, भक्तप्रिय, सर्वांच्या सहाय्याला कायम धावून जाणारा, सुखवस्तू असे श्रीमंत बहुगुणी स्थळ चालून आल्यावर कोणता बाप आपली मुलगी देणार नाही बरे? परंतु, तसे व्हायचे नव्हते. पार्वतीच्या मनात काही वेगळेच होते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना." तिने वैराग्य, विरक्तीने भारलेला, गरीब, बेघर, स्मशानात राहणारा, सदा ध्यानस्थ, मागेल त्याला काहीही देणारा, प्राणी-पशू-पक्ष्यांच्या सान्निध्यात राहणारा, आगापिछा नसणारा, भोळा शंकर, केवळ त्याच्या या सद्गुणावर व मदनासारख्या रूपावर ती भाळली. तिने बंडखोरी केली. चक्क पळून गेली. अरण्यात राहून, कंदमुळे , पाने खाऊन अतिशय उग्र तपस्या केली. झाले. भोळे सांब प्रसन्न झाले व त्यांनी तेथल्या तेथे `गांधर्व' विवाह केला.जगातील नव्हे, त्रैलोक्यातील हा खरा पहिला प्रेमविवाह..

आवडीचा वर पसंत करून त्याच्याशी विवाह केला. त्याही काळी मुलीचे मत विवाहाच्या वेळी विचारात घेतले जाई, परंतु तो तिला व घराण्याला, समाजाला साजेसा म्हणजे रंगरुपाने नव्हे, तो मुद्दा गौण आहे; परंतु तिला पोशील असा हवा, असा विचार वडीलधाऱ्या  मंडळीत असे.  आता बहुतांशी तो विचार केला जात नाही. प्रेमात पडतात. परंतु पडल्यावर आपल्या पायावर पुन्हा उभे राहण्याचे सर्वांनाच जमते. असे नाही. १० ते २० टक्के विवाह होतात अन् त्यातले १० ते २० टक्केच यशस्वी होतात. प्रेमाचा रंग उडाला की केवळ विवाह राहतो. मग ती तडजोड राहते. आजही विवाहाच्या बाबतीत कोणतेच भेद पाळले जात नाहीत हे खरे आहे व चांगलेही. परंतु, वितुष्ट निर्माण झाले, की एकमेकांचे नको ते "भेद" काढले जातात. त्याला मर्यादा नसते. मग वैफल्य येते, घटस्फोट होतात, प्रेमभंग होतात, प्रसंगी घात-अपघात आणि हत्याही. अगदी वैयक्तिक, सामुहिक, गाव, समाज पातळीपर्यत.

आजच्या या व्रतातून आपल्याला नेमके हेच घ्यायचे आहे, की पार्वतीने कोणताही भेद न पाळता प्रसंगी आपल्या माणसांना दूर करून केवळ गुण बघून तावून सुलाखून मग जोडीदार निवडला. त्यासाठी उग्र तप केले. निष्ठा ठेवून त्याच्याशीच संसार केला. तेव्हाच तिला महापराक्रमी, लोकप्रिय, बुद्धिवंत असे कार्तिकेय व श्रीगणेश पूत्र प्राप्त झाले. पतीचा व सासरचा अपमान, तो आपला मानून प्रिय अशा माहेरशी संबंध तोडले, ही एकनिष्ठा. प्रेम करताना गुण-दोषासकट ती व्यक्ती केवळ आपली म्हणून स्वीकारायची असते. सुख-दु:खात सहभागी व्हायचे असते. त्याला अर्धांग असे म्हणतात. एकमेकांच्या विचारविनिमयातून संसाराचे जाळे घट्ट विणायचे असते. मग ते मोजून सात जन्मासाठीच का? कायमचेच! `का भुललासी वरलीया रंगा' कींवा `चेहेरोने लाखों को लुटा' असे प्रेम नको ते बेगडी असते. कापराप्रमाणे उडून जाते. प्रेम हे वासनारहित असावे. दृढ व निखळ असावे. क्षुल्लक कारणावरून रिलेशन बिघडले की आपले ‘ship’ भरकटते अन् मग दुःखाच्या खडकावर जाऊन आपटते.

एकाला काटा टोचला, तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे, याला प्रेम म्हणतात. मग ते कोणाचेही असो,कोणामध्येही असो,कोणतेही असो, ते सर्वथा सारखेच असते. इथे तर साक्षात त्रिभुवन रूप सुंदरी परंतु गुणग्राहक. गुणांची पूजा करणारी. माणसाने रूपाचे कींवा बाह्यांगाचे, डामडौलाचे, श्रीमंतीचे वा पदव्यांचे, पदांचे पूजन न करता गुणांची कदर करावी मग तो मानव ही देव बनून पूजनीय होतो. हीच या व्रताची सांगता!

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतGanesh Mahotsavगणेशोत्सवAdhyatmikआध्यात्मिक