शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:04 IST

Guru Purnima 2025 Information: कोणत्याही गोष्टीत सातत्य असल्याशिवाय फळ मिळत नाही, गुरुपौर्णिमेला २१ दिवस बाकी असल्याने दिलेली उपासना करा, स्वामीकृपेची प्रचिती घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

जुलै च्या १० तारखेला गुरु पौर्णिमा(Guru Purnima 2025) आहे. २० जून पासून उपासनेला सुरवात केली तर १० जुलैला २१ दिवसाच्या उपासनेची करता येयील . प्रत्येक क्षणी महाराज आपल्या सोबत असतात, दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही, पण ते असतात . आपल्याला दुःख झाले की त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. आपल्या लाडक्या भक्तांना काहीही कमी पडू देत नाहीत. खडतर तपस्या करून घेतील, परीक्षा घेतील पण एक दिवस इतके भरभरून देतात की त्यांच्यावर असलेलेसगळे रुसवे फुगवे आपण विसरून जातो. 

गुरु पौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस. आपले नित्य कर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही. कारण श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची गोष्ट... येतंय ना लक्षात?

प्रत्येक दिवस ही एक पायरी आहे . अशा २१ पायर्यांची साधना आपल्याला महाराजंच्या समीप नेणार ह्यात शंका नको. आत्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा, समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे. आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालीलपैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया. प्रत्येक पायरीवर महाराज काही न काहीतरी बोध करून देतील, आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांना आरसा दाखवतील. आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल. प्रत्येक पायरी अनमोल आहे. आपल्याच आयुष्याचा लेख जोखा आपल्यासमोर उलगडेल. सतत दुसऱ्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होवू. २१ व्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचेही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे ते अंशतः तरी समजेल. 

>> अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण >> श्री स्वामी कृपा तारक मंत्र ( रोज ११, २१, ५१, १०८ जमेल तसा )>> श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण >> श्री आनंदनाथ महाराज ह्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण>> दत्त बावन्नी >> मानसपूजा >> स्वामी महाराजाच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नेवेद्य

वरील पैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना २१ दिवस संकल्प करून करू शकतो. त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. ह्या सर्वाचा उपयोग म्हणजे, आपल्या स्वतः मध्ये पुढील २१ दिवसात होत जाणारा बदल. प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळत जातात. प्रचीती माणसाला जगायची उमेद देते आणि महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणीत करते . प्रचीतीविना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचीती दिल्याशिवाय कसे राहतील? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात. गुरुपौर्णिमा, प्रगट दिन ही तर फक्त निम्मित्त आहेत, आपण ह्या दिवसांची वाट न पाहता अगदी ह्या क्षणापासून साधनेला सुरवात केली पाहिजे. आपल्यातील उत्तम माणूस, भक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते. साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो, त्याला गुरु चरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. साधनेच्या ह्या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात, आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते. साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो. आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो. मनाची सात्विकता, शांतपणा, संयम, विचार करण्याची क्षमता, मनन चिंतन सर्वकाही ह्या काळात होत जाते आणि त्यातून एक साधक तयार होतो. लहान सहान गोष्टीत न अडकता आपले जीवन गुरु चरणांशी समर्पित करता आले पाहिजे हेच साधना शिकवते. भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असताना झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहेत आणि अशाच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मनशांती मात्र घालवून बसतो. मनाची शांतता , मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी ह्या २१ पायऱ्या २१ दिवसात चढताना दिव्य अनुभव येतात. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होत जाते. आयुष्यभर दुसऱ्यांचे गुण अवगुण शोधणाऱ्या आपल्याला आपल्यातील असंख अवगुणाची ओळख होते . मन स्वीकारते पण अंतर्मन नाही, अशा सर्व गोष्टी आरशासारख्या स्वच्छ होतात. आपल्यातील आणि महाराजांच्यामधील आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते. महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती किती भाग्यवान असतील. डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो. 

स्वामी म्हणजे स्वाः मी...ह्या साधनेतून आपण आपल्यातील मी ला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . महाराजांच्या नावातच आणि त्यांच्या चरणाशी आपले जग आहे बाकी सबकुछ फोल आहे, अर्थहीन आहे ह्याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला कात टाकल्यासारखे नवीन जीवन देईल ह्यात दुमत नसावे. तुम्हा आम्हा सर्वाना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाshree swami samarthश्री स्वामी समर्थIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधी