शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Guru Purnima 2021 : लोकमान्य टिळक यांना राष्ट्रगुरु का म्हटले जात असे, त्यामागे आहेत 'ही' कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:06 IST

Guru purnima 2021 : जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला.

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवतो, तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरु असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-

अलीकडच्या इतिहासात गेल्या शे दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यता दुसऱ्या कोणाला मिळालेली नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ व निष्कल असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यांच्यामुळे तुरुंग पावन झाला असे एका कवीने म्हटले आहे.

लोकी निंद्य कारावास, परि तू पावन केले त्यास।।

रँडच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा तुकडा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरू श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले, की ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन मिळते, हे समजल्यावर कैद्यांना घरुन जेवण आणायची मुभा होती ते आपल्या डब्यातून लोकमान्यांना आवडणारे पदार्थ मागवीत आणि युक्तीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवित. 

येरवड्याच्या तुरुंगात टिळक असताना तेथील शिपाई टिळकांना आवडती सुपारी त्यांना देण्यात आनंद मानत असे. काही समाजकंटक लोकमान्यांना हिणवण्यासाठी तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत. परंतु समाजाच्या या वर्गाचा लोकमान्यांवर अतिशय लोभ होता. 

टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले त्यावेळी पुण्यातील काही देवळांमध्ये चक्की दीपोत्सव साजरा झाला. सरदार खाजगीवाल्यांनी टिळक सुटून येईपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही असा पण केला होता. टिळक सुटून आल्यावर थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

१८९८ च्या प्रारंभी मुबईला प्लेगची साथ होती. प्लेग प्रतिबंध लस विश्वासार्ह न वाटल्याने टिळक ती लस टोचून घेण्यास नाखुष होते. त्यामुळे तुरुंगातील इतर कैदीही लस टोचून घ्यायला तयार होईना. मग डॉक्टरांनी टिळकांना सांगितले, `तुम्ही लस टोचून घ्या  तरच इतर लोक लस घेतील.' टिळकांची खात्री पटल्यावर त्यांनी अणि इतर कैद्यांनी लस टोचून घेतली. 

टिळक तुरुंगातून सुटून येईपर्यांत लोकांनी अनेक उपासतापास केले, नवस केले, आवडते पदार्थ सोडले. अनुष्ठाने केली. टिळक राष्ट्राचे पुढारी होते, पण प्रत्येकला ते आपल्या घरचेच कोणी वडीलधारे आहेत, असे वाटे. टिळकांसारखा लोकोत्तर आदर्श पुढारी अद्वितीय स्थान प्रस्थापित करणारे टिळक या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे राष्ट्रगुरु म्हणून पुजनीय वाटतात.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाLokmanya Tilakलोकमान्य टिळक