शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

Guru purnima 2021 : गुरु न केल्यामुळे संत नामदेवांची इतर संतमंडळींसमोर फजिती कशी झाली, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:01 PM

Guru Purnima 2021: देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. तो अहंकार दूर करण्यासाठी गुरु पाहिजेच!

एकदा संत गोरोबा काकांकडे सगळी संतमंडळी जमली होती. ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताई, निवृत्ती, नामदेव असे सगळे एकत्र जमलेले असताना मुक्ताईने कुतुहल म्हणून गोरोबा काकांना विचारले, 'गोरोबा काका, गोरोबा काका, ते कोपऱ्यात ठेवले आहे, त्याला काय बरं म्हणतात?'गोराबा काका म्हणाले, 'मुक्ते, त्याला थापटणे म्हणतात. त्याने कच्ची मडकी कोणती आणि पक्की कोणती हे आपटून ओळखता येते.'मुक्ता ज्ञानोबा दादाकडे बघून हसत म्हणाली, `अय्या, कित्ती छान आहे हे. मग इथे जमलेल्या मडक्यांपैकी कोणते मडके कच्चे आणि कोणते पक्के हे ओळखता येईल का?'

हे ऐकताच नामदेवाने कान टवकारले. पण सभेतून उठून कसे जायचे, म्हणून तो निमूट बसून काय चाललंय हे पाहत होता.गोरोबा काका मुक्तेला म्हणाले, `बघता येईल की, त्यात काय एवढं?'

असे म्हणत गोरोबा काकांनी सर्व संत मंडळींच्या डोक्यावर थापटणे मारायला सुरुवात केली. नुसत्या आवाजाने नामदेवाच्या डोक्यावर टेंगुळ येऊ लागले. तो घाबरला आणि त्याच्यावर पाळी आली तेव्हा म्हणाला, `ही कसली परीक्षा? मला नाही तपासून घ्यायचं काही. माझं मडकं पक्कच आहे. माझ्याशी खुद्द पांडुरंग खेळतो, बोलतो, माझं सगळं ऐकतो. मग मी कसा राहीन कच्चा?'यावर गोरोबा काका मुक्तेकडे बघत म्हणाले, `मुक्ते हे आहे कच्च मडकं!'

नामदेव रागारागात पाय आपटीत तेथून बाहेर पडला. मुक्ता धावत त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, `नामदेवा, असा रागावू नकोस. गोरोबा काका म्हणाले त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस, उलट स्वत:मध्ये सुधारणा कर. अरे, विठोबा तुझ्याशी खेळतो, बोलतो याचा तुला अभिमान झाला आहे. परंतु तू गुरु केला असतास, तर या गोष्टीचा वृथा अभिमान कधीच गळून पडला असता. हा मी पणा दूर करण्यासाठी गुरुंना शरण जा. गुरु केल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही...

सद्गुरु अनुग्रहावीण हरीला तो कठीण सर्वथा पटणे,गोरा संत परीक्षी मस्तकी हाणून सर्व थापटणे।।

देवाचे सान्निध्य सतत राहावे असे वाटत असेल, तर अहंकाराचे अस्तित्त्वच नको. यासाठी तू विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना शरण जा, ते तुला आपला शिष्य करून घेतील आणि तुझे हे आधेअधुरे मडके पूर्ण पक्के होईल.

नामदेवाने मुक्तेचा शब्द उचलून धरला आणि विसोबा खेचर यांची भेट घेतली व त्यांचे शिष्यत्त्व स्वीकारले. गुरुंनी नामदेवाला अनुग्रह दिला त्यानंतर नामदेवांची कधीच फजिती झाली नाही. म्हणून संतांनी, देवांनी जसा गुरु केला, तसा आपणही केला पाहिजे.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा