शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:50 IST

Gopal Kala 2025: कृष्ण जन्मानंतर १४ वर्षांनी देवकी वसुदेवाला मिळाली मुक्ती, पुत्र प्राप्ती होऊनही त्यांच्या वाट्याला हे भोग का आले? याचं कृष्णाने दिलेलं उत्तर जाणून घ्या. 

श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री देवकी वसुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यावेळी ते दोघेही बंदिवासात होते. कारण देवकीच्या आठव्या पुत्रापासून तिच्या भावाला म्हणजेच कंसाला मृत्यूचे भय होते. ही आकाशवाणी झाल्यापासून कंसाने दोघांना नजरकैदेत ठेवले होते. देवकीची सहा बाळं मारली. सातवा गर्भ गळाला असे कंसाला वाटले, मात्र नियतीने तो गर्भ सुरक्षितपणे वासुदेवाच्या दुसऱ्या पत्नीच्या उदरी पाठवला. कालांतराने भाद्रपद षष्ठीला तिला मुलगा झाला त्याचे नाव बलराम ठेवण्यात आले. वासुदेवाचा मित्र नंद याने त्या बाळाचे थाटात बारसे केले. आठव्या वेळेस देवकी गर्भवती राहिली तेव्हा नंदाची पत्नी यशोदाही गर्भवती राहिली आणि दोघींना श्रावण वद्य अष्टमीला संततीप्राप्ती झाली. देवकीला मुलगा आणि यशोदेला मुलगी. मात्र कंसाने या बाळाला मारण्याआधी त्याला नंदाच्या वाड्यात पोहोचवण्याची वासुदेवाला भगवंताने जबाबदारी सोपवली. सैनिकांसकट सर्व प्रजाजन योगनिद्रेमध्ये झोपले असताना वासुदेव तान्ह्या बाळाला घेऊन गोकुळात निघाला. यमुना नदी पार करून नंदाच्या वाड्यात पोहोचला. आपला मुलगा तिथे ठेवून तिथे नुकतीच जन्माला आलेली योगमाया घेऊन वासुदेव परत आला. येताच तिने मोठ्याने टाहो फोडला. कंसाला जाग आली आणि तो तिला मारायला पोहोचला. ती कन्या हातातून निसटली आणि जगदंबा प्रगट झाली आणि तिने कंसाला सांगितलं तुझा काळ जन्माला आला आहे. 

आपलं बाळ नंदाच्या घरी सुखरूप आहे हे ऐकून देवकी वासुदेवाला समधान मिळाले. मात्र कंसाने त्यांना बंधमुक्त केले नाही उलट त्यांच्यावर कठोर नियम लादले. असे एक दोन नाही तर १४ वर्ष चालले. तोवर नंदाच्या घरी यशोदेला सुख देऊन कृष्ण मोठा झाला आणि त्याने मथुरेकडे कूच केली. कंसाचा वध केला आणि त्याच्या बंदिवासात असलेल्या सगळ्या निरपराधी कैद्यांची सुटका केली. त्यातच त्याचे जन्मदाते आई वडील होते. त्यांनी बाहेर आल्यावर कृष्णाला डोळे भरून पाहिले. तेव्हा देवकी म्हणाली कृष्णा यायला एवढी वर्ष का लावलीस?

कृष्ण म्हणाला, एवढी कुठे? मोठा होताच आलो. 

देवकी म्हणाली तरी १४ वर्ष लावलीस कृष्णा.... जन्म माझ्या पोटी घेतलास पण मातृसौख्य यशोदेला दिलंस. नक्की कसली शिक्षा दिली मला?

कृष्ण हसून म्हणाला, 'आई...शिक्षा देणारा मी कोण? मी फक्त परतफेड केली. 

देवकी डोळ्यात प्राण आणून म्हणाली, 'कसली रे परतफेड?'

कृष्ण म्हणाला.... 'राम अवतारकार्यात दिलेल्या १४ वर्ष वनवासाच्या शिक्षेची!'

या उदाहरणावरून लक्षात येते, की कृष्णाने भगवद्गीतेत कर्मयोग केवळ सांगितला नाही तर तो आचरणातही आणला. तुम्ही जे कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे, या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. आपले भोग हे आपल्यालाच संपवावे लागतात. त्यामुळे कर्म शुद्ध ठेवा, फळ शुद्धच मिळेल. 

टॅग्स :Lord Krishnaभगवान श्रीकृष्णIndian Festivalsभारतीय उत्सव-सण