शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

देव सर्व ठायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 6:55 PM

सबंध चैतन्यमय सृष्टी देवाच्या व्यापकत्वाने भरुन आहे, अशी दृष्टी जेव्हा भक्तात विकसीत होणे सुरु होते.

ब्रह्माउन्मादपरमानंदे । जंव जंव पाहे स्वानंदबोधे । तंव तंव चराचर पूर्णानंदे । देखे स्वानंदकंदे दुमदुमित॥ पृथ्वी आप तेज वायु नभ ।देखे हरिरुप स्वयंभ। भूतां महाभूतांचे डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे ॥

          तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है ।        जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है ॥                  एक ती दृष्टी आहे जी देवाला फक्त मूर्तीत पाहते. केवळ मूर्तीत भक्ती आहे. एक ती दृष्टी आहे ज्याला कुठेच देव दिसत नाही. मूर्तीतही नाही. भक्ती या विचारापासूनच तो विभक्त असतो. ज्याला मूर्तीत देव दिसतो त्याने  मानले आहे की, मूर्तीत देव आहे व ज्याला मूर्तीत देव दिसत नाही त्याने मानले आहे की देव मूर्तीत नाही. अशी भक्त अभक्ताची दृष्टी असते.              परंतु तिसरी एक दृष्टी आहे जिला भारतात ज्ञानदृष्टी म्हटले गेले आहे. ज्यांना देव मूर्तीत दिसतो व ज्यांना देव नाही दिसत त्या दोघांनी आपल्या सामान्य दोन डोळ्यांचे दृष्टीने, चर्मचक्षुने पाहून, स्थुल दृष्टीने पाहून ठरविले आहे की देव आहे की नाही.  परंतु तिसरी जी एक दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी. जिला आम्ही दिव्यदृष्टीही म्हटले आहे, ती तिसर्‍या नेत्राची दृष्टी मानली आहे. ती भगवान शिवाचे, महादेवाचे कपाळाचे ठिकाणी तिसर्‍या डोळ्याचे रुपाने दाखविली जाते. म्हणून तर महादेवाला आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणतो. तिसरा नेत्र असलेला ईश्वर. आम्ही तिसरा नेत्र चित्रात दाखवितो. पण ती नेत्र दाखविण्यासाठीची चित्र कल्पना आहे. पण वास्तवात दोन डोळ्याचे मध्यभागी असलेली ती सुक्ष्म अनुभूति आहे. जो ज्ञानी भक्त शिवत्वाच्या स्वरुपाला, सुक्ष्म स्वरुपाला जाणतो त्याचे ठायी सुध्दा हा तिसरा नेत्र खुलतो. तिसर्‍या नेत्राची दिव्य दृष्टी खुलते. त्याचेकरिता मग देव नाही अशी जागा नाही. एकनाथ महाराज म्हणतात, त्याला सर्व ठायी, वनी जनी जनार्दन दिसू लागतो. ठायी ठायी त्याला आत्मतत्वरुपाने  देवाचे अस्तित्व दिसू लागते आणि हे अस्तित्व व्यक्तिरुप नाही तर आनंदरुप, चैतन्यरुप जाणवते. म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात                      ब्रह्माउन्मादपरमानंदे ।                    जंव जंव पाहे स्वानंदबोधे ।      तंव तंव चराचर पूर्णानंदे । देखे  स्वानंदकंदे दुमदुमित॥

ब्रह्मा उन्माद परमानंदे. ब्रह्म म्हणजे आमचा निर्माता देव. त्या देवाच्या, ब्रह्माचे आनंदाच्या उन्मादाने, त्या देवाचा आनंद एवढा प्रचंड आहे, एवढा उन्मादरुप आहे की, दिव्यदृष्टी लाभलेल्या त्या भक्ताला, आपल्याच ठायी असलेल्या आनंदाचा बोध होतो, स्वानंदाचा बोध होतो. आपणही आनंद स्वरुप असल्याचे बोधाने तो जेव्हा जेव्हा जेथे जेथे पाहतो, अनुभवतो, तेव्हा तेव्हा अवघे चर अचर, स्थीर अस्थिर जे काही आहे सृष्टीत तेथे तेथे देव आहे हे तो जाणतो.                   पृथ्वी आप तेज वायु नभ ।         देखे हरिरुप स्वयंभ। भूतां महाभूतांचे डिंभ ।               न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे ॥पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश ही सर्व पंचमहाभूते,त्याला हरिरुप, देवरुप दिसू लागतात. मनुष्य, पशु,पक्षी, वृक्ष आदि भूत असो की पंचमहाभूत असो  सर्वा ठायी अभिन्न असे ब्रह्मरुप, देवाचे रुप तो भक्त पाहतो. हे अभिन्नत्व एवढे एकरुप आहे या अभिन्न देवत्वाला सोडून भिन्न असा अंकुर त्याला कुठेही दिसतच नाही.चंद्र, सूर्य,  अग्नीरुप तेजस्वी तारे  लखलखीतपणा,  प्राण्यांच्या नयनातील तेज, हे सर्व त्या दिव्य सतेज आत्मज्योतीरुपाने भक्त पाहतो. वाघाचे डोळ्यातील तेजस्वीता वा गाईचे, हरिणाचे पाडसाचे डोळ्यातील निर्मळ तेज ही त्या पशुची आपली निर्मिती नाही. ती तेजस्वीता देवाची आहे, हे तो भक्त पाहतो.           सबंध पृथ्वी गंध रुप आहे. परंतु तिचा तो गंध गुलाबांसारख्या विविध फुलांतून, कस्तुरीतून, चंदनातून, कापूरातून जसा स्पष्ट जाणवतो, तशी देवाची सत्ता सर्वत्र त्या भक्ताला जाणवते.           यालागी सात्विका ठायी सत्व ।                तेथ देखे भगवत्तत्त्व ।   सत्त्वे सत्त्ववंता महत्त्व । अति मान्यत्व हरिरुपे ॥

सात्विक गुणाच्या ठिकाणीच जे सत्त्व असते, ते भगवत सत्त्व आहे.  जे खरे सात्त्विक आहेत, सत्त्ववंत आहेत, त्यांना या शुध्द सत्त्वामुळेच, महत्त्व  व देवरुपाने मान्यता मिळते.        पृथ्वी भोवती जे जळाचे आवरण आहे, त्याला चतुःसमुद्र म्हणतात. ते समुद्र, तसेच पूर्व पश्चिम इत्यादि जे दशदिशांचे भाग आहेत ती सर्व देवाचीच अंगे आहेत. त्या अंगाने तो श्रीरंग भक्ताला अंगरुप, मूर्तीरुप भासतो. ह्या विशाल मूर्तीच्या रुपाने तोच देव उभा आहे असे तो पाहतो. जर छोटी पाषाण मूर्ती तो आहे तर विश्वव्यापक अस्तित्वरुप मूर्तीही त्याचीच आहे हे तो भक्त जाणतो. गवत, दुर्वा, हराळ, वृक्ष, वेली हे जणु त्याच्या शरीराचे रोम आहेत असे तो भक्त हरिरुप दृष्टीने पाहतो. मोठ्या वटवृक्षाच्या पारंब्या वेगवेगळ्या जरी दिसत असल्या तरी त्यांचे अस्तित्व हे वटरुपानेच असते. त्याचप्रमाणे देवाचे चैतन्यापासूनच अनेक नद्यांचे ओघ चैतन्यमयरुपाने वाहत असल्याचे तो भक्त पाहतो.                अशा प्रकारे सृष्टीतील वेगवेगळी रुपे पाहतांना, जसजसा त्याचा उल्हास, आनंद वाढत जातो, तसतसे सर्व जग हे देव रुपाने नटलेले आहे असे तो भक्त अनुभवतो. मग त्या अनुभव स्थितीत गवत असो की पाषाण, मुंगी असो की माशी, मच्छर असो की गरुड, गाय असो की गाढव, कुणी निंद्य असो की वंद्य तो त्या सर्वांना एक देवाचे तत्वरुपानेच पाहतो.                एकनाथ महाराज म्हणतात की, असा अनुभव कशाने येतो ?               करिता पूजाविधीविधान।                 का श्रवण मनन चिंतन ।                      सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण ।             "पूर्ण प्राप्ती" जाण त्यातेचि वरी ॥

            या असीम सृष्टीत मी च एक नाही तर सबंध चैतन्यमय सृष्टी देवाच्या व्यापकत्वाने भरुन आहे, अशी दृष्टी जेव्हा भक्तात विकसीत होणे सुरु होते व ह्या दृष्टीतून तो पूजाविधी, श्रवण, मनन, चिंतन  करु लागतो आणि त्यातून सर्व अस्तित्व एकाच चैतन्याने भरलेले आहे अशी एकतत्वरुपी भावना त्याचे ठिकाणी निर्माण होते तेव्हा त्याचे ठायी, "मी" पणाचे लघुत्व, सिमित्व न राहता व्यापकत्वाने पूर्णत्वाची प्राप्तीच अशा भक्ताला होते. तेव्हा तो जेथेही जातो तेथे त्याला देवाचे अस्तित्व दिसते. सर्व ठायी देव दिसतो.

                                       

- शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिक