शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाजवळ असावी; काय होते गुपित ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:31 IST

राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाकडे असावी. ही खोली माती विटांची, भिंतींची नसली तरी चालेल, ती मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी.

एक राजा होता. जो नि:संतान होता. वयोमानाने थकला होता. त्याच्या राज्याला उत्तराधिकारी नसल्याने तो नेहमी चिंतीत असे. राज्याचा कारभार उचित हाती सोपवून राजाला निवृत्ती घ्यायची होती. पण ही जबाबदारी सोपवायची कोणाला, याबद्दल राजाने प्रधानाशी सल्ला मसलत केली. 

तत्कालीन व्यवस्थेप्रमाणे अशी परिस्थिती उद्भवल्यास हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला सोपवून राजा निवडण्याची तयारी दर्शवावी, असे प्रधानाने सुचवले. राजाला पटले. त्याने राज्यात दवंडी पिटवली. हत्तीची सूक्ष्म दृष्टी व्यक्तीची पारख करताना चुकत नाही, या बाबीवर विश्वास ठेवून पंचक्रोशीतल्या लोकांना बोलावून राज्याच्या प्रिय हत्तीला जबाबदारी सोपवली. हत्तीने तीन -चार परिक्रमा घातल्या. सर्वांची उत्कंठा वाढली. अचानक त्याने एका फाटक्या वेषातल्या युवकाच्या गळ्यात पुष्पमाला घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. नवीन राजा नियुक्त झाला. राजाची काळजी मिटली. राज्याची सूत्र त्याच्या हाती सोपवून त्याने निवृत्ती घेतली. 

नवीन राजा पूर्वानुभव नसतानाही सहकाऱ्यांच्या मदतीने, नम्रपणे राज्यकारभार करू लागला. लोकांची नवीन राजावर श्रद्धा बसू लागली. हा नवनिर्वाचित राजा रोज दिवसभराचे काम काज आटोपून एका बंद खोलीत एकटाच जात असे. तिथे तासभर घालवून मग झोपी जात असे. त्या खोलीच्या चाव्या फक्त राजाकडे होत्या. राज दरबारातल्या लोकांमध्ये तो उत्सुकुतेचा विषय झाला. ही चर्चा राज्यभर पसरली. एक दोघांनी राजाला विचारून पाहिले पण त्याने उत्तर द्यायचे टाळले. 

लोकांची वाढती चर्चा पाहून शेवटी एक दिवस राजाने दरबार भरवला आणि सांगितले, 'आज मी तुम्हाला त्या बंद दालनाविषयी सांगणार आहे. तिथे तुमच्या कल्पनेतली एकही वस्तू नाही. तर तिथे आहे माझा जुना अंगरखा. तोच अंगरखा, जो मी राजा म्हणून नियुक्त झालो त्या दिवशी घातला होता. तो मी त्या बंद दालनात जतन करून ठेवला आहे.' 

तसे करण्यामागचे नेमके कारण काय, असे प्रधानाने विचारले असता राजा म्हणाला, 'आपले मूळ काय, आपण कोणत्या परिस्थितीतुन आलो, आपले हात आकाशाला लागले तरी आपले नाते धरणीशी आहे या गोष्टींची जाणीव सतत होत राहावी आणि डोक्यात अहंकाराचा शिरकाव होऊ नये, म्हणून मी रोज तो अंगरखा पाहतो. चिंतन करतो. जे मिळाले आहे ते देव दयेने मिळाले आहे. मला ते जबाबदारीने पार पाडायचे आहे आणि अमुक एका वेळी मलाही निवृत्त व्हायचे आहे, याची जाणीव मला हा अंगरखा कायम देत राहील.' 

या कथेतून बोध हाच घ्यायचा, की राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाकडे असावी. ही खोली माती विटांची, भिंतींची नसली तरी चालेल, ती मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी. कारण त्या खोलीत आपले जुने दस्तावेज, आपल्या आठवणी आणि आपले सोनेरी दिवस कैद असतात! त्याची वरचेवर उजळणी होत राहिली की अहंकाराचा वारा आपल्यालाही कधीच लागणार नाही.  तुमच्याकडे आहे अशी रहस्यमय खोली? 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी