शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचं नियोजन करत बसू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:43 IST

तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे.

प्रश्नकर्ता : मी माझे आयुष्य आखतो आहे आणि बरेचदा नियोजनामध्ये हरवून जात आहे. तरीसुद्धा अजूनही गोष्टी मला हव्या तश्या घडत नाही आहेत. मी काय करू?

सद्गुरू : योजना तुमच्या मनात असतात. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्याच तुम्ही करू शकता. नियोजनाला किती वेळ द्यायचा आणि प्रत्यक्ष काम करायला किती वेळ द्यायचा हे प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य बघून ठरवायला हवे. तुम्ही जर नियोजन समितीवर असला तर तुम्ही फक्त नियोजन कराल - तेच तुमचे काम आहे. त्याची अंमलबजावणी करणे हे दुसऱ्याचे काम आहे. तुमच्या कामाचे स्वरूप काहीहि असले तरी जीवनाचे स्वरूप असेच असते कि तुम्ही फक्त आत्ताच खावू शकता, तुम्ही फक्त आत्ताच श्वास घेवू शकता, तुम्ही फक्त आत्ताच जगू शकता. नियोजन सुद्धा तुम्ही फक्त आत्ताच करू शकता. तुम्ही उद्याबद्दल चे नियोजन करू शकता. पण तुम्ही उद्या नियोजन करू शकत नाही.

आयुष्य एखाद्या योजनेप्रमाणे घडावं का?

एखादी योजना हा फक्त एक विचार आहे, आणि आपल्या सगळ्या योजना आपल्याला जे आधीपासून माहीत आहे त्यावर आधारित असतात. आपली योजना ही आपल्या भूतकाळाचीच सुधारित आवृत्ती असते. एखादी योजना म्हणजे भूतकाळाचा एखादा तुकडा घ्यायचा आणि त्याला थोडा मेकअप करायचा. ही जगण्याची खूपच क्षुद्र पद्धत झाली. आपल्याला एखाद्या योजनेची निश्चितच गरज असते, पण तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे.आयुष्यातील शक्यतांची व्याप्ती इतकी मोठी असते की कोणीही त्या प्रमाणे योजना आखू शकत नाही. एक पर्यायी व्यवस्था म्हणून नियोजन करायला हरकत नाही पण आयुष्य आपले आपण घडू द्या. आयुष्यातील शक्यतांचा शोध घ्या. तुमच्या समोर काय येईल, काही सांगता येणार नाही.आत्तापर्यंत इतर कोणाच्याहि बाबतीत न झालेली गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकते. पण जर तुमचे आयुष्य तुमच्या योजनेप्रमाणे जात असेल तर आत्तापर्यंत जगात जो मूर्खपणा होत आला आहे, तोच तुमच्याही बाबतीत घडेल. नवीन असं काहीच घडणार नाही कारण तुमची योजना तुम्हाला आधी माहित असलेल्या गोष्टी, ज्ञान आणि अनुभवावर आधारित असते.

नियोजन किती प्रमाणावर करावे याचे तुम्ही भान राखले पाहिजे. तुमच्याकडे कोणतीच योजना नसेल तर तुम्हाला उद्या काय करावे ते कदाचित कळणारही नाही. आयुष्यात ठराविक समतोल साधत आणि आयुष्याबद्दलची समज लक्षात घेऊन काय नियोजन करायचे आणि काय सोडून द्यायचे हे ठरवले पाहिजे. बहुतांशी लोकांच्या योजना कुठल्याही दिव्यदृष्टीतून आलेल्या नसतात. अनपेक्षित गोष्टीना घाबरून तोंड देता न येण्याच्या भीतीतून त्या प्रामुख्याने जन्माला आलेल्या असतात. माणसाला त्यांचे आयुष्य त्यांच्या म्हणण्या प्रमाणे घडत नाही हेच एकमेव दुःख असते. तुम्हाला सकाळी कॉफी हवी असते आणि तुम्हाला कॉफी मिळत नाही, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असता. परंतु उत्कृष्ट सूर्योदय होत असतो आणि तुम्ही तो बघत नाही. तुमची एखादी क्षुल्लक योजना प्रत्यक्षात येत नाही पण त्याहून कितीतरी उच्च कोटीचे काहीतरी घडत असते.या विश्वाच्या पसाऱ्यात आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या जीवनाच्या आविष्कारात तुमच्या योजना क्षुल्लक आहेत. तुमच्या योजनांना इतके महत्व देवू नका.उद्या सकाळी काय करायचे याची एखादी योजना करण्याची गरज निश्चितच आहे, पण तुमचे आयुष्य तुमच्या योजनेप्रमाणे जावे अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तुमचे आयुष्य तुमच्या योजनांच्या, कल्पनाशक्तीच्या आणि तुमच्या सर्व अपेक्षांच्या पलीकडचे घडावे असे स्वप्न नेहमी बघा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक