शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

देवासी अवतार भक्त्तांसी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 03:06 IST

देहू, आळंदीहून निघालेल्या दिंड्या-पालख्या पुण्यात स्थिरावलेल्या असताना दिंड्या-पालख्यांच्या छत्र, चामरांच्या, अश्व, अब्दागिऱ्यांच्या वैभवासोबत व टाळ, मृदुंग, वीणा वाजवीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा नामघोष करणाºया वारकऱ्यांसोबत वासुदेवही पालखीत असतात. भारूड व लळीतांमध्ये वासुदेवाचे सोंग काढले जाते. बाळसंतोष, जोशी, सौरी, अशी सोंगे भारुडात सादर होतात.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकअलंकापुराहून संत ज्ञानेश्वर महाराज व देहूहून तुकाराम महाराज यांच्या दिंड्या-पालख्या पुण्यात येतात तेव्हा संपूर्ण पुणे शहर व परिसर विठ्ठलाच्या, माउलीच्या नामघोषाने दुमदुमून जातो. पंढरपूरपर्यंत पुरेल इतके धान्य, भाजीपाला, अन्य जिन्नस खरेदीसाठी बाजारात भाविकांच्या उड्या पडतात.प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीच्या परमार्थाकडे वळलेली वारकºयांची पावले जणू वारीच्या प्रपंचासाठी उत्साहात असतात. प्रपंच व परमार्थ यांच्यातील विसंवाद नव्हे, तर सुसंवाद साधण्याचे मोठे योगदान वारकरी संप्रदायाचे आहे. कर्मालाच योग मानणे हे या संप्रदायाच्या भक्तीचे वर्म आहे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दृष्काळे पीडा केली’ अशी उद्विग्नता व त्यातून आलेली विरक्ती संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केली असली वा ‘संसार दु:ख मूळ चहूकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।’ असे संतांनी म्हटलेले असले तरी संतांनी नेटका प्रपंच करून परमार्थ साधनेची शिकवण दिली. यामुळेच जनाबार्इंना जाते सुंदर वाटते. त्या म्हणतात, ‘सुंदर माझे जाते गं, फिरते बहुत ओव्या गावू कवतिके, तू ये रे बा विठ्ठला।’ जिवा-शिवाच्या दोन्ही पाळ्यांचे जाते जनाबार्इंना प्रपंच व परमार्थाच्या भावविश्वाचे द्योतक वाटते. संतांच्या ‘वासुदेव’ या रूपकातही निद्रा आणि जागृतावस्था यांचे सुरेख चिंतन आहे.अल्प आयुष्य मानव देह।शत गणिले ते अर्ध रात्र खाय।मध्ये बालत्व पीडा रोग क्षय।काय भजनासी उरले ते पाहे गा।क्षणभंगुर नाही भरंवसा।व्हावे सावध तोडा माया आशा।काही न चाले पडेल गळां फासा।अशा या ‘वासुदेव’ या रूपकातूनतुकारामांनी क्षणभंगुर आयुष्याचे चिंतन केले आहे. वासुदेव वारीत‘रामकृष्ण वासुदेवा।जागवी जनासीवाजवी चिपळिया। टाळ घागºयाघोषे रामकृष्ण वासुदेवा’असे चिंतन करतात.राम कृष्ण गीतीं गात। टाळ चिपळ्या वाजवीत। छंदे आपुलिया नाचत। नीज घेऊनी फिरत गा।।असे तुकारामांनी म्हटले आहे. वासुदेव नीज घेऊन फिरतो म्हणजे त्याच्यासोबत असलेले त्याचे श्रेयस व प्रेयस म्हणजे साक्षात परमेश्वर अंतरी घेऊन फिरतो. ‘अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ’ असा संदेश वासुदेव देतो. प्रपंचाची निरर्थकता व परमार्थाची सार्थकता स्पष्ट करीत दान पावलं, दान पावलं म्हणतो. आता पालखी-दिंड्यांचा सोहळा व त्यातील वासुदेवाच्या संकीर्तनाला आपण पारखे झालो आहोत. कोरोनामुळे ‘अल्पआयुष्य मानवदेह’ झाले आहे दुसरे काय?