शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

देवासी अवतार भक्त्तांसी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 03:06 IST

देहू, आळंदीहून निघालेल्या दिंड्या-पालख्या पुण्यात स्थिरावलेल्या असताना दिंड्या-पालख्यांच्या छत्र, चामरांच्या, अश्व, अब्दागिऱ्यांच्या वैभवासोबत व टाळ, मृदुंग, वीणा वाजवीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा नामघोष करणाºया वारकऱ्यांसोबत वासुदेवही पालखीत असतात. भारूड व लळीतांमध्ये वासुदेवाचे सोंग काढले जाते. बाळसंतोष, जोशी, सौरी, अशी सोंगे भारुडात सादर होतात.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकअलंकापुराहून संत ज्ञानेश्वर महाराज व देहूहून तुकाराम महाराज यांच्या दिंड्या-पालख्या पुण्यात येतात तेव्हा संपूर्ण पुणे शहर व परिसर विठ्ठलाच्या, माउलीच्या नामघोषाने दुमदुमून जातो. पंढरपूरपर्यंत पुरेल इतके धान्य, भाजीपाला, अन्य जिन्नस खरेदीसाठी बाजारात भाविकांच्या उड्या पडतात.प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीच्या परमार्थाकडे वळलेली वारकºयांची पावले जणू वारीच्या प्रपंचासाठी उत्साहात असतात. प्रपंच व परमार्थ यांच्यातील विसंवाद नव्हे, तर सुसंवाद साधण्याचे मोठे योगदान वारकरी संप्रदायाचे आहे. कर्मालाच योग मानणे हे या संप्रदायाच्या भक्तीचे वर्म आहे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दृष्काळे पीडा केली’ अशी उद्विग्नता व त्यातून आलेली विरक्ती संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केली असली वा ‘संसार दु:ख मूळ चहूकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।’ असे संतांनी म्हटलेले असले तरी संतांनी नेटका प्रपंच करून परमार्थ साधनेची शिकवण दिली. यामुळेच जनाबार्इंना जाते सुंदर वाटते. त्या म्हणतात, ‘सुंदर माझे जाते गं, फिरते बहुत ओव्या गावू कवतिके, तू ये रे बा विठ्ठला।’ जिवा-शिवाच्या दोन्ही पाळ्यांचे जाते जनाबार्इंना प्रपंच व परमार्थाच्या भावविश्वाचे द्योतक वाटते. संतांच्या ‘वासुदेव’ या रूपकातही निद्रा आणि जागृतावस्था यांचे सुरेख चिंतन आहे.अल्प आयुष्य मानव देह।शत गणिले ते अर्ध रात्र खाय।मध्ये बालत्व पीडा रोग क्षय।काय भजनासी उरले ते पाहे गा।क्षणभंगुर नाही भरंवसा।व्हावे सावध तोडा माया आशा।काही न चाले पडेल गळां फासा।अशा या ‘वासुदेव’ या रूपकातूनतुकारामांनी क्षणभंगुर आयुष्याचे चिंतन केले आहे. वासुदेव वारीत‘रामकृष्ण वासुदेवा।जागवी जनासीवाजवी चिपळिया। टाळ घागºयाघोषे रामकृष्ण वासुदेवा’असे चिंतन करतात.राम कृष्ण गीतीं गात। टाळ चिपळ्या वाजवीत। छंदे आपुलिया नाचत। नीज घेऊनी फिरत गा।।असे तुकारामांनी म्हटले आहे. वासुदेव नीज घेऊन फिरतो म्हणजे त्याच्यासोबत असलेले त्याचे श्रेयस व प्रेयस म्हणजे साक्षात परमेश्वर अंतरी घेऊन फिरतो. ‘अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ’ असा संदेश वासुदेव देतो. प्रपंचाची निरर्थकता व परमार्थाची सार्थकता स्पष्ट करीत दान पावलं, दान पावलं म्हणतो. आता पालखी-दिंड्यांचा सोहळा व त्यातील वासुदेवाच्या संकीर्तनाला आपण पारखे झालो आहोत. कोरोनामुळे ‘अल्पआयुष्य मानवदेह’ झाले आहे दुसरे काय?