शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

दत्त गुरुंचे चोवीस गुरु : तिसरे गुरु : वायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 15:51 IST

ब्रह्मादिकों देह पाळावे व डुकरादिकांचे टाळावे, अशी विषम दृष्टी वायूची नसते. राजाचा देह आवडीने प्रतिपाळावा व भिकाऱ्याचा देह टाळावा, असा भेद प्राणाच्या ठायी नसतो. तसाच योगी देखील उच्चनीच, वर्णावर्ण आणि उत्तम अधम गुणावगुण पाहून आपला समभाव सोडत नाही. असा समभाव धारण करण्यासाठी वायुला गुरु करावे. 

गुरुंचे गुरु परात्पर गुरु म्हणजे दत्तगुरु, त्यांनीही कलियुगात अवतरून गुरु केले. एक दोन नाही तर चोविस गुरु. त्या गुरुंकडून ते काय शिकले, ते जाणून घेत आपणही चोविस गुरुंचा देवदत्त परुळेकर यांच्या लेखणीतून आजपासून दत्तजयंतीपर्यंत रोज थोडा थोडा परिचय करून घेऊया. जेणेकरून आपल्यालाही पदोपदी जेव्हा गुरुंची उणीव भासेल, त्यावेळेस दत्तगुरुंची गुरुभक्ती आठवून आपल्यालाही गुरुंचा शोध घेता येईल. 

हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!

पृथ्वी आणि पर्वत यानंतर अवधूताचा पुढचा गुरु आहे, `वायु'. या वायुगुरुचे दोन प्रकार वर्णिले आहेत. देहस्थ प्राण वायु आणि बाह्य वायु. देहस्थ प्राणवायुकडून आहारादि बाह्य विषयामध्ये अनासक्तीचे शिक्षण घेतले असे अवधुत सांगतो. हे सांगताना कोणतीही साधना करणाऱ्या विद्यार्थ्याने आहार विहाराचे नियंत्रण कसे करावे, हे नाथांनी सुंदर सांगितले आहे. प्राणाच्या व्यापारामुळे भूक लागते. भुकेने प्राण क्षोभतो. त्यामुळे काया, वाचा, मन, इंद्रिये अशक्त अकार्यक्षम होतात. त्या वेळी प्राणरक्षणापुरता कसलाही आहार मिळाला तरी तो गोड आहे का नाही, हा विचार प्राणी करत नाही. त्याप्रमाणे योगी देहाची अहंता धरीत नाही. विषय सेवन केल्यावर प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही, तसा योग्याला पण होत नाही. साधकाचा, विद्यार्थ्याचा आहार कसा असावा पहा-

क्षुधेचिया तोंडा, मिळो कोंडा अथवा मांडा,परी रसनेचा पांगडा, न करी धडफुडा तयासी,ज्ञानधारणा न ढळे, इंद्रिये नव्हती विकळे,तैसा आहार युक्तिबळे, सेविजे कवळे निजधैर्ये।

भुकेच्या तोंडाला कोंडा मिळो की मांडा मिळो, योगी रसनेचा अंकित होत नाही. ज्ञानधारणा ढळणार नाही आणि इंद्रिये विकल होणार नाहीत अशा युक्तीने व धीरपणे योगी आहार सेवन करतो. समता वर्तावी हे पारमार्थिक जीवनाचे एक मुख्य ध्येय आहे. प्राणवायूकडून अवधुताने समत्व हा गुण ग्रहण केला आहे. 

ब्रह्मादिकांचा देह पाळू, का सूरकरादिकांचा देह टाळू,ऐसा न मानीच विटाळू, प्राणू कृपाळू देहभावे।

ब्रह्मादिकों देह पाळावे व डुकरादिकांचे टाळावे, अशी विषम दृष्टी वायूची नसते. राजाचा देह आवडीने प्रतिपाळावा व भिकाऱ्याचा देह टाळावा, असा भेद प्राणाच्या ठायी नसतो.

तैसे उंच नीच वर्ण, अधमोत्तमादि गुणागुण,देखोनिया यागी आपण, भावना परिपूर्ण न सांडी।

तसाच योगी देखील उच्चनीच, वर्णावर्ण आणि उत्तम अधम गुणावगुण पाहून आपला समभाव सोडत नाही. असा समभाव धारण करण्यासाठी वायुला गुरु करावे. 

हेही वाचा : आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!