शहरं
Join us  
Trending Stories
1
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
2
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
3
६० वर्षांच्या गर्लफ्रेंडच्या हट्टाला कंटाळला ४५ वर्षांचा बॉयफ्रेंड; भेटायला बोलावलं अन् सगळंच संपवलं!
4
३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
5
दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो...
6
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
7
वेळेवर EMI भरूनही CIBIL Score का घसरतो? 'क्रेडिट मिक्स' आणि इतर ४ महत्त्वाची कारणे जाणून घ्या
8
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
9
Chikki Recipe: 'या' पद्धतीने चिक्की करा; पहिल्या झटक्यातच चविष्ट आणि खुटखुटीत होईल 
10
'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!
11
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
12
IND vs SA : मार्कोचा खतरनाक बाउन्सर अन् मार्करमनं हवेत झेपावत टिपला डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल! (VIDEO)
13
तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार?
14
'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 
15
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
16
नांतवाला भेटायला गेला, कॅनडातून भारतीयाला हाकलवून दिले; मुलींचा छळ, जबरदस्तीने 'सेल्फी' घेणं पडलं महागात
17
तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
18
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 
19
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
20
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
Daily Top 2Weekly Top 5

Chaturmas 2023: कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चातुर्मासात कांदा लसूण आहारातून वर्ज्य करतात; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 14:04 IST

Chaturmas 2023: चातुर्मासात अनेक जण अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करतात, पैकी एक म्हणजे कांदा लसूण आहारातून वर्ज्य करणे; पण का? जाणून घ्या!

पलाण्डुभक्षणं पुनरुपनयम् ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो. 

वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानलेआहेत. खाद्यपदार्थांची हिंसात्मक व निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीतकमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते. ताजी फळे वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात. हविष्यान्नाचे पदार्थ म्हणजे दूधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध. नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध. कंदहार साठ टक्क्यांपर्यंत, कांदा लसूण ऐंशी टक्यांपर्यंत, अंडी नव्वद टक्क्यांपर्यंत, तर मांस-मासे-मद्य शंभर टक्के निषिद्ध मानले जातात. 

हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे. म्हणून कांदा, लसूण वर्ज्य मानले आहे. कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत.

कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो. 

त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानीकारक ठरू शकते. धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते. 

सद्यस्थितीत आपण कांदा, लसूण यांच्या एवढे आहारी गेलो आहोत, की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हलत नाही. म्हणून त्यांचा वापर पूर्णपणे बंद करता आला नाही, तर निदान कमी करता येईल. तसेच उपवासाच्या दिवशी, सकाळच्या जेवणात त्यांचा वापर निश्चितपणे टाळता येईल. आणि ज्यांना हे व्रत अंगिकारायचे असेल त्यांनी २९ जूनपासून अर्थात आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत पाळावे असे शास्त्र सांगते!

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न