शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

भूवैकुंठ पंढरी। तशीच जेजुरी।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 04:03 IST

एका परीने हे ‘हरी’ आणि ‘हर’ यांचेच नामजागरण असते. ‘हर’ म्हणजेच शंकर... शंकराचा अवतार खंडोबा. हरी म्हणजे विठ्ठल.

- प्रा.डॉ.प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकजेजुरीला पालख्यांचा मुक्काम असतो. तेथे रात्री टाळ-मृदुंगाचा गजर सुरू असतो आणि घोळ, कोटंबा, दिमडी घेतलेल्या वाघ्या- मुरळ्यांचे जागरणदेखील रंगलेले असते. विठ्ठलाचा नामगजर आणि खंडोबाचे जागरण जेजुरीत रंगते. एका परीने हे ‘हरी’ आणि ‘हर’ यांचेच नामजागरण असते. ‘हर’ म्हणजेच शंकर... शंकराचा अवतार खंडोबा. हरी म्हणजे विठ्ठल.कानडा विठ्ठल व कानडा मल्हारी ही दोन्ही दैवते म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा सांस्कृतिक अनुबंध. चैत्र-वैशाखात खंडोबाच्या विविध ठाण्यांच्या यात्रा-जत्रा सुरू असतात. यात्रा व जत्रेत एक प्रमुख फरक असतो. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात ती यात्रा. कीर्तन सप्ताह आयोजित होतात त्या यात्रा व जेथे देवाला सामिष नैवेद्य असतो आणि तमाशाचा फड रंगतो ती जत्रा. चैत्र-वैशाखात कानड्या मल्हारीच्या जत्रा महाराष्ट्र व कर्नाटकात सुरू असतात. लागलीच आषाढात माउलीच्या दुधासारख्या पर्जन्यधारा बरसू लागतात. आकाशात घन निळे होतात अन् सावळ्या विठ्ठलाचे वेध त्याच काळात वारकऱ्यांना लागतात. मल्हारीचा लोकदैवत संप्रदाय तर विठ्ठलाचा भक्तिसंप्रदाय. विठ्ठल व मल्हारी म्हणजे खंडोबा, यांची तुलना करणारे अतिशय सुंदर पद दगडूबाबा साळी यांनी रचले आहे. ते पद असे -भू वैकुंठ पंढरी। तशीच जेजुरी असे सांगती संत वर्णिती ।तेथे राही रखुमाबाई।येथे बाणाई म्हाळसा सती । तेथे बुक्याचे भूषण।येथे उधळण भंडार किती भक्तजन येती भाळी लाविती।तेथे पुंडलिक सगुण येथे प्रधान हेगडेपती।तेथे भीमा चंद्र भागा।येथे कºहा गंगा भक्तजन येति स्नान करिती।तेथे टाळ। मृदुंग। वीणा।येथे घण घणा घाटी गर्जती।या पदामधून महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदाय आणि लोकदैवत संप्रदाय यांचे अतिशय मनोहारी दर्शन घडते. ज्ञानेश्वरांची पालखी, सोपानदेवांची पालखी सासवड, जेजुरीमार्गेच पंढरीला जाते. या दोन्ही दैवतांची मोहिनी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील जनमानसावर अद्याप कायम आहे. ‘हरी-हर भेद काही करू नये वाद’ असे संतांनी म्हटले आहे. संत जनाबार्इंचे खंडोबाचे भारूड आहे ते असे -खंडेराया तुज करिते नवसू।मरू दे माझी सासू। खंडेराया ।।धृ।।सासू मेल्यावर। होईल आसरा।। मरू दे सासरा। खंडेराया।।१।।सासरा मेल्यावर। येईल मज धीर।। मरु दे माझा दीर। खंडेराया।।२।।दीर मेल्यावर।होईल आनंद।। मरु दे नणंद। खंडेराया। ३।।नणंद मेल्यावर। होईल मोकळी।। घेईल गळा। झोळी भंडाऱ्यांची।। ४।।जनी म्हणे खंडो। अवघाचिभरू दे ।। एकली राहू दे।पायापाशी ।। ५ ।।पंढरीच्या वाटेवर अबीर-गुलालाच्या वाटा जेजुरीजवळ भंडाºयाच्या होताना विठ्ठलाच्या संकीर्तनाचे भाविकांना वेध लागतात.