शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

आयुर्वेद केवळ रोगावर इलाज नाही तर रोग समूळ नष्ट करते; यासाठी पाळा 'हा' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:48 IST

आहार शास्त्राबद्दल दरदिवशी वेगवेगळे नियम वाचायला मिळतात, याबाबत प्राचीन आयुर्वेदात आहारशास्त्राशी निगडित कोणते नियम दिले आहेत ते पाहू!

अलीकडच्या काळात आपण सगळेच आरोग्याप्रती सजग झालो आहोत. एवढेच काय, तर आपण काय खातो, किती खातो, कसे खातो यावर लक्ष ठेवणारे मोबाईल अ‍ॅप आपल्यावर नियंत्रण ठेवतात, दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सूचना देतात. जेवणात किती कर्बोदके, प्रथिने असली पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन करतात. एकूणच आपला आहार मोजून मापून होऊ पाहत आहे. हे कमी म्हणून की काय, आपल्यावर सतत डाएट फूडच्या व्हिडिओचा समाज माध्यमांतून मारा होत असतो. अशाने आहारशास्त्राबाबत आपण सावध होत आहोत की गोंधळत आहोत, अशी अवस्था निर्माण होते. याबाबत प्राचीन शास्त्र म्हणून ओळखले जाणारे आयुर्वेद काय म्हणते, ते सुभाषितातून समजावून घेऊ. 

भोजनं हीनमात्रं तु न बलोपचयौजसेसर्वेषां वातरोगाणां हेतुतां च प्रपद्यतेअतिमात्रं पुन: सर्वानाशु दोषान प्रकोपयेत् 

वाग्भट संहितेत हे सुभाषित दिले आहे. उचित प्रमाणाहून कमी अन्न खाल्ले असता बल, पुष्टी व तेज उत्पन्न होत नाही व असे वागणे वातव्याधीस कारणीभूत होते. अति प्रमाणात घेतलेल्या आहाराने तर सर्वच दोषांचा प्रकोप होतो.

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटले आहे, `अन्नाद् भवन्ति भूतानि' म्हणजे अन्नापासूनच सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात व अन्नावरच त्यांचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे योग्य अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात उपास करून स्वत:ची उपासमार करणे वा डाएटिंगच्या नावाखाली शरीराला क्लेश देणे हे आयुर्वेदाला संमत नाही. त्याने त्रासच होतो. पण त्याचबरोबर अति प्रमाणात घेतलेला आहारही अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण करणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार या दोन्हीतला सुवर्णमध्य शोधणे आवश्यक असते.

अन्नेन पूरयेदर्धं तोयेन तु तुतीयकम्उदरस्य तुरीयांशं संरक्षेद्वायुचारणे

पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग अन्नाने भरावेत. एक भाग पाण्याने भरावा व उरलेला चौथा भाग वायूंच्या संरक्षणासाठी मोकळा सोडावा. मात्र अल्पाहार किंवा उपोषण म्हणजे मिताहार नाही, हे लक्षात ठेवावे. 

आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगावर इलाज करत नाही, तर रोगाचे समूळ उच्चाटन करते किंवा रोग होऊच नये म्हणून तजवीज करते. त्यामुळे आहाराबाबत एकतर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा आयुर्वेदाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि ऐकीव माहितीनुसार शरीरावर कोणतेही प्रयोग करू नये, हे इष्ट!

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यAyurvedic Home Remediesघरगुती उपाय