हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये दिवसाचा 'संध्याकाळचा काळ' किंवा 'गोधुलीची वेळ' (सूर्यास्त होण्यापूर्वीचा आणि नंतरचा थोडा वेळ) अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. हा काळ पूजा, ध्यान आणि शांतता यासाठी समर्पित असतो. याच वेळेत नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी होतात, अशी धारणा आहे. म्हणून, ज्योतिषीय नियमांनुसार, या विशिष्ट वेळेत काही दैनंदिन कामे करणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे घरात दारिद्र्य, कलह आणि नकारात्मकता वाढू शकते.
Astrology: कुत्रा, मांजरीचे रात्री रडणे का अशुभ मानले जाते? याला शास्त्राधार आहे की लोकसमजूत?
ही ५ कामे पुढीलप्रमाणे :
१. घरामध्ये झाडू मारणे (स्वच्छता करणे)
संध्याकाळच्या वेळेत किंवा सूर्यास्तानंतर कधीही घरात झाडू मारू नये आणि कचरा बाहेर फेकू नये.
कारण: अशी मान्यता आहे की, संध्याकाळी घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. या वेळेस झाडू मारल्यास आणि कचरा बाहेर फेकल्यास लक्ष्मी घरातून बाहेर जाते, ज्यामुळे घरातून धन-समृद्धी कमी होते.
२. तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी देणे
संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला (Tulsi Plant) चुकूनही स्पर्श करू नका, पाने तोडू नका किंवा पाणी देऊ नका.
कारण: तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. संध्याकाळच्या वेळी तुळस विश्रांती घेत असते. या वेळेस तिला स्पर्श करणे किंवा पाणी देणे हे तिचा अपमान मानला जातो, ज्यामुळे धन आणि शांतीचा नाश होतो. याउलट मंदपणे तेवणारा दिवा लावणे शुभ मानले जाते.
३. कोणाकडूनही पैसे घेणे किंवा देणे (कर्जाचे व्यवहार)
गोधुलीच्या वेळेस पैशांचे मोठे व्यवहार, कर्ज घेणे किंवा कर्ज परत करणे पूर्णपणे टाळावे.
कारण: या वेळेस पैशांचे व्यवहार केल्यास ते व्यवहार अशुभ ठरतात. कर्ज घेतले असल्यास ते फेडणे कठीण होते आणि दिलेले पैसे परत मिळत नाहीत, ज्यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होते.
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
४. दही किंवा दूध देणे (दुग्धजन्य पदार्थांचे दान)
सूर्य मावळल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी दही (Curd), दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचे दान किंवा व्यवहार करू नये.
कारण: दूध आणि दही यांचा संबंध चंद्राशी आणि लक्ष्मीशी मानला जातो. संध्याकाळी या वस्तू दुसऱ्याला दिल्यास, घरातून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य बाहेर जाते, अशी श्रद्धा आहे.
५. केस विंचरणे किंवा नखं कापणे
संध्याकाळच्या वेळी केस विंचरणे, नखं कापणे किंवा दाढी करणे यांसारखी सौंदर्य आणि स्वच्छता संबंधित कामे करू नयेत.
कारण: या कृतींमुळे शरीरातून ऊर्जा बाहेर फेकली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, संध्याकाळी अशी कामे करणे नकारात्मकता वाढवते आणि लक्ष्मी रुष्ट होते.
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
मग संध्याकाळच्या वेळेस काय करावे?
संध्याकाळचा काळ देवपूजा, ध्यान, आरती करणे आणि तुळशीजवळ दिवा लावणे यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेस घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
Web Summary : Dusk is sacred. Avoid sweeping, disturbing Tulsi, lending money, giving dairy, grooming. These invite poverty. Instead, pray and light a lamp for Lakshmi's blessings.
Web Summary : शाम पवित्र है। झाड़ू लगाने, तुलसी को परेशान करने, उधार देने, डेयरी दान करने, संवारने से बचें। ये गरीबी को आमंत्रित करते हैं। इसके बजाय, लक्ष्मी के आशीर्वाद के लिए प्रार्थना करें और दीपक जलाएं।