शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: कर्जबाजारी होण्याची वेळच येऊ नये म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:07 IST

Astro Tips: ज्योतिष शास्त्रात काही तोडगे दिले आहेत, जे आपल्या दिनचर्येचा भाग बनवले तर आरोग्य, धन, संपत्ती यांची वास्तूमध्ये उणीव भासत नाही. 

घरात आपण गृहव्यवस्थेचा एक भाग म्हणून विविध नियम पाळतो. ज्योतिष शास्त्राने त्यातच काही असे तोडगे सुचवले आहेत, जे केले असता आपली वास्तू सुख-संपत्ती-आरोग्याने परिपूर्ण राहते. ते उपाय कोणते ते जाणून घेऊ. 

१) दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.

२) 'यश्च्याय कुबेराय वैष्णवाय, धन – धान्यधिपतये धन – धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा!' ऊत्त्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा  जप करावा.

३) एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून “हनुमान स्तोत्र ११वेळा म्हणावे. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. 

४ ) कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.

५) दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्‍भवणार नाही.

६ ) घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.

७ )घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ  येणार नाही.

८) ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकु अर्पण करुन विसर्जीत करा नफा हेच त्याचे सुत्र

९) खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका. मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणाम लक्ष्मी स्थिर होते.

१०) अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्रौ दही+भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकु टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर वर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचर्‍यात टाकून द्यावे. परीणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते.

११) रोज रात्री जेवताना  अन्नाचा घास बाजूला काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तू पुरूष व आपले वास्तू दैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाहीत.

१२) प्रत्येक शनिवारी व अमावास्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम नकारात्मक शक्ति घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून वाईट शक्ति आत येऊ शकत नाही.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष