शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:54 IST

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो, पण त्यामागची पार्श्वभूमी माहीत आहे का?

येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जायला निघाले आहेत. काल अर्थात १८ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज १९ जून रोजी ज्ञनेश्वर माऊलींची पालखी निघाली. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाशी संबंधित गोष्टी जाणून घेऊ. 

Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...

विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते, तरी संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाही, मग हा उल्लेख आला कुठून? त्याबद्दल जाणून घेऊ. 

पांडुरंग, विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले, तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. कारण त्याचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे, एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता, म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले. त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही म्हणून 'गेला माधव कुणीकडे' हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या. 

Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!

राही कोण? 

राही म्हणजे कृष्ण अवतारातली कृष्ण सखी राधा! तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुख्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त-भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच या राणिया सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका!

तरी विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर वेगवेगळे का?

विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद विवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुख्मिणीला खटकते, म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला न्याहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले. 

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही, यात रुख्मिणी मातेचा तर दोष नाहीच, पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही; कारण देही असोनि विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे. त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत... जय हरी विठ्ठल!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpur Wariपंढरपूर वारीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण