शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 07:00 IST

History of the Pandharpur Vitthal Temple: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी तो तिथे २८ युगांपासून उभा आहे, त्याबद्दल...

विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते, भक्त भगवंताच्या परस्परावरील निस्सीम प्रेमाची कथा. आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे. हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा! एक दोन नाही तर अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. आषाढी एकादशीनिमित्त(Ashadhi Ekadashi 2025) याबद्दल सविस्तर जाणून घेऊ...

सुमारे २८ युगापूर्वी  श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारेकेतून दिंडीर वनात आले होते, त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकांची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले, तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई-वडिलांची सेवा करीत होते. भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले, भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते, श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, 'सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे. 

श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला. देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता. म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाट देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हटले, देवा काही काळ या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच.'

आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटले, 'देवा, माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना? माझं चुकलं, मला क्षमा कर!'

श्रीकृष्ण म्हणाले, 'पुंडलिका आई वडिलांची सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा मोठी असते. ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलो असतो. पण तुझ्या मातृ-पितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझा आदर्श पुढील पिढयांसमोर सदैव राहावा, यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील.' 

भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकालादेखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला. याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे, 

'पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा!' 

पण अठ्ठावीस युगंच का?

देशपांडे पंचांगचे देशपांडे गुरुजी सांगतात, 'त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षांची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिष शास्त्रात केली आहे. यात चार युगं आहेत- कृत, त्रेता, द्वापार, कली! ही सगळी मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षं होतात. त्याला एक महायुग असे म्हटले जाते. आरती मध्ये अठ्ठावीस युगाचा उल्लेख केला आहे, ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अठ्ठावीस वेळा ही चार युगं फिरली आहेत. त्यातल्या श्वेतवाराह कल्पातलं सातवा मन्वंतर सुरु आहे. त्यातली अठ्ठावसावी चतुर्युगी आहे. थोडक्यात अनादिकालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे. आजच्या पावन दिनी आपणही ती आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊया. 

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।देव सुरवर नित्य येती भेटी ।गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।राई रखुमाबाई राणीया सकळा ।ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।दिंड्या पताका वैष्णव नाचती ।पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सणashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारी