शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:40 IST

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते; त्यासाठी हा सोपा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा!

यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होत आहे, तो कार्तिकी एकादशीला समाप्त होईल. चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे. कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो. यात पुण्यसंचय व्हावा या हेतूने दान, धर्म, उपासना केली जाते. चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम रोज म्हटल्याने वा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही. कारण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊण तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच. अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही. त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश नाम स्तोत्र! या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचलात तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येईल! विष्णूसहस्त्र नामावलीत विष्णूंची १००० नावे आहेत, ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून रोज म्हणावीत! कारण, विष्णू षोडशनाम स्तोत्र विष्णू सहस्त्र नामाइतकेच प्रभावी आहे आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे आहे; सविस्तर वाचा!

औषधे चिंतये विष्णुम भोजने च जनार्धनम,शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम,युद्धे चक्रधरम देवं प्रवासे च त्रिविक्रमं,नारायणं तनु त्यागे श्रीधरं प्रिय संगमे,दुःस्वप्ने स्मर गोविन्दम संकटे मधुसूधनम,कानने नारासिम्हम च पावके जलाशयिनाम,जलमध्ये वराहम च पर्वते रघु नन्दनं,गमने वामनं चैव सर्व कार्येशु माधवं।षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत,सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते।

अर्थ : शरीर आजारी असताना, औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे, अन्न खाताना त्यांच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे, झोपताना त्यांच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे, विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे, युद्धाला जाताना, त्याच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे, प्रवास करताना त्यांच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे. मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे, संसारसुखाच्या वेळी त्यांच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे, दुःस्वप्नांच्या वेळी त्यांच्या गोविंद  रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्यांच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे. वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे, आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रिस्त रूपाचे ध्यान करावे, पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह स्वरूपाचे ध्यान करावे, पर्वत आणि जंगलात, भटकताना त्याच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे. जर तुम्ही त्यांच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्यांच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे.

जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात, त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते. असा या स्तोत्र पठणाचा महिमा आहे. 

त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी सकाळी न चुकता हे छोटंसं स्तोत्र म्हणा आणि मोठे लाभ अर्थात सर्वांगीण लाभ मिळवा. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३