शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलार्म हे केवळ झोपेतून जागे करणारे यंत्र नाही, तर आयुष्याला कलाटणी देणारा मंत्र आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 08:00 IST

चांगली वेळ यावी असे ज्यांना वाटते त्यांनी वेळेवर उठून चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे!

रोज सकाळी वेळेत जाग यावी, म्हणून आपण सगळेच अलार्म लावून झोपतो. किती वाजता उठतो, हे महत्त्वाचे नसून ठरवलेल्या वेळात आपण उठतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अलार्म ठरवलेल्या वेळेत होतो, मात्र तो बंद करणारे लोक चार प्रकारचे असतात. कोणते ते पहा,

एक वर्ग असा आहे, जे अलार्म लावतात, परंतु तो कितीही वाजला, तरी ते उठत नाहीत. अलार्मच्या आवाजाने बाकीचे उठतील, पण अलार्म लावणारी व्यक्ती निश्चिंत झोपलेली असते. 

दुसरा वर्ग असतो, त्यांना अलार्म वाजलेला कळतो. ते उठतात, आणखी दहा मीनिटांची वेळ वाढवतात आणि झोपतात. अशा लोकांच्या मोबाईलमध्ये या वाढीव वेळेची देखील वर्गवारी केलेली असते. पाच मीनिटे, दहा मीनिटे, पंधरा मीनिटे किंवा अर्धा तास. त्यानंतर अलार्म थांबतो आणि लोक उठतात.

तिसऱ्या वर्गातले लोक अलार्मच्या आवाजाने उठतात, त्यांना जाग येते, डोळे उघडतात पण अंथरुणातून उठायचा आळस करतात. ते बराच वेळ जागे राहतात, विचार करतात, दिवसभराच्या कामांची मनातल्या मनात आखणी करतात आणि पडल्या पडल्या पुढचा अलार्म लावून झोपी जातात.

चौथा वर्ग मात्र अलार्म होताच क्षणी तो बंद करून उठतो. आवरतो, दिवसभराच्या आखलेल्या कामांची सुरुवात करतो. एकदा उठल्यावर रात्रीपर्यंत पुन्हा अंथरुणाकडे पाहतही नाही. 

या चार वर्गांपैकी आपण कोणत्या वर्गात मोडतो, हे एव्हाना आपले तपासून झाले असेल. परंतु, यावरुन व्यक्तिमत्त्व कसे ओळखायचे, असा प्रश्न पडला असेल, तर यावर गौर गोपाल दास छान स्पष्टीकरण देतात.

अलार्म दोन प्रकारचे आहेत, पहिला झोपेतून जागे करणारा आणि दुसरा वास्तवाची जाग आणणारा. आपल्याला केवळ सकाळपुरता विचार करायचा नाही, तर सुप्तावस्थेतही जागृत राहायला शिकायचे आहे. 

पहिला वर्ग, ज्यांना अलार्म वाजलेला ऐकू येत नाही, हे लोक आयुष्यात अडचणी दिसूनही परिस्थितीकडे डोळेझाक करतात. मात्र, अशाने समस्या कमी होत नाहीत, तर उलट वाढतात. 

दुसरा वर्ग, अलार्म बंद करून पुन्हा पुन्हा झोपणारा. असे लोक कामाची टाळाटाळ करतात. त्यांना वास्तवाचे गांभीर्य कळते, परंतु त्याला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता नसते. म्हणून ते केवळ चालढकल करत राहतात.

तिसरा वर्ग, अलार्म झाल्यावर जाग येणारा परंतु काही क्षणात झोपणारा. अशा लोकांना परिस्थिीची जाणीव होते. ते नव्या उर्जेने कामाला लागतात. सकारात्मकतेने नवनव्या आव्हानांना तोंड देतात. परंतु, काही अडचणी आल्या, की त्यांच्यातला उत्साह मावळू लागतो आणि ते नैराश्याने ग्रासून प्रयत्न सोडून देतात.

आणि चौथा वर्ग, अलार्म वाजल्यावर उठून कामाची सुरुवात करणारा. असे लोक ठरवलेली कामे चोखपणे पार पाडतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी ते न डगमगता त्यांना सामोरे जातात. योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य जीवनशैलीचे अनुसरण करतात. असे लोक केवळ स्वत:ची नाही, तर आपल्याबरोबर इतरांचीही प्रगती करतात. 

आपल्यालाही चौथ्या वर्गात सामील व्हायचे आहे. आत्मोन्नती करून घ्यायची असेल, तर आपल्याला वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आपण जर वेळ पाळली, तर निश्चितच आपलीही चांगली वेळ येत राहील.