शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 9, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरती अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून चांगले औचित्य कोणते?

ठळक मुद्देआरती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े. आरती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

आरती म्हणजे आर्तता. आरती म्हणजे प्रार्थना. आरती म्हणजे संवाद. तोही कोणाशी? तर प्रत्यक्ष देवाशी. ती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े  मात्र, आपण सूर-तालात एवढे रंगून जातो, की आपले आरतीच्या भावार्थाकडे लक्षच जात नाही. मराठीतील अनेक आरत्या आपल्याला तोंडपाठ आहेत. तशीच हिंदी भाषेतील शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. ती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते...

ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे,भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे।।

ओंकारशक्तीत सामावलेल्या जगदिशाचा जयजयकार असो. तू आम्हा भक्तांवर आलेले संकट क्षणात दूर करतो. तो क्षण यायला वेळ लागतो, कारण आमच्या संकटकाळी आम्हाला कणखर बनवण्यासाठी तू परीक्षा पाहतोस. परंतु, कितीही झाले, तरी भक्ताला अपयश येऊ देत नाहीस आणि एका क्षणात चित्र पालटून टाकतोस.

हेही वाचा: Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

जो ध्यावे फल पावे, दु:ख विनसे मनका।सुख संपती घर आवे, कष्ट मिटे तन का।।

देवाने प्रत्येकाची सोय लावून ठेवलेली असते. भक्ताने काही मागण्याआधीच त्याने भरभरून दिलेले असते. तरीदेखील, भक्ताच्या प्रयत्नांना जोड म्हणून तू अनुकूल वातावरण तयार करतोस आणि त्याच्या प्रयत्नांना यश देतोस. प्रयत्नवादी व्यक्ती अपयशाला घाबरत नाही. संकटातही संधी शोधत असते. अशा लोकांचा तू मार्गदर्शक होतोस आणि त्यांना इच्छित फळ देतोस. 

माता पिता तुम मेरे, शरण गहू में किसकी,तुमबिन और न दुजा, आस करू में किसकी।

जो भक्त आपल्या भगवंतामध्ये सर्व नाती शोधतो किंवा प्रत्येक नात्यात भगवंताला शोधतो, तो कधीच एकटा पडत नाही. त्याच्यासाठी 'तुमही हो बंधू सखा तुम्ही' अशीच भगवंताप्रती भावना असते. भगवंत हाच सुख-दुख:चा वाटाड्या होतो. 'सुख सांगावे सकलासी, दु:ख सांगावे देवासी' या उक्तीप्रमाणे, भक्त आपल्या देवाप्रती समर्पित असता़े.  तो सोबत असताना, अन्य कोणाची आस राहतच नाही. भगवंत प्रत्येक रूपात नाते निभावून भक्ताचे आयुष्य परिपूर्ण करतो. 

तुम पुरण परमात्मा, तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी।।

तुझ्यापासून काहीच लपलेले नाही. एकवेळ जगाशी खोटे बोलू शकतो, स्वत:लाही फसवू शकतो, मात्र, तुझ्याशी काहीच लपवून ठेवू शकत नाही. कारण, माझा उगमच तुझ्यातून झाला आहे. तूच गीतेत म्हणून ठेवले आहेस, `ममै वांशो जीवलोके' अर्थात सृष्टीवरचा प्रत्येक जीव हा तुझाच अंश आहे आणि प्रत्येक जीवाचा सांभाळ करणाराही तूच आहेस. तू पाठीशी असताना, कसलीही भीत वाटत नाही. तुझी सोबत होती, म्हणूनच तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा विजय झाला. आमच्याही संसार रथाचे सारथ्य तुला करायचे आहे. म्हणून हे परमात्मा, अर्जुनासारखे आम्ही तुलाच मागून घेत आहोत. 

तुम करुणा के सागर, तुम पालन कर्ता,में मुरख खल कामी, कृपा करो भर्ता ।।

मनुष्य स्वभाव हा षडविकारांशी जोडलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यामुळे कितीही नाकारले, तरी दुसऱ्या  व्यक्तीबद्दल आमच्या मनात कमी अधिक प्रमाणात असूया, तिरस्कार, राग, द्वेष असतोच. मात्र, तू आमचे अनंत अपराध पोटात घेऊन आम्हाला रोज नवी संधी देतोस. तरी आम्ही मूर्ख तुझे महत्त्व न ओळखता, तुझ्यावरच राग धरतो. आमच्या चुका पदरात घे आणि आम्हाला सद्बुद्धी दे. 

क्रमश:

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना