शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 15, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म.

ठळक मुद्देआपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सर्वांची सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत वाङमयाची ताकदच एवढी आहे, की ते वाचताना आपण आपल्या मनाशी हितगुज करत आहोत की काय, असा भास होतो. आता माऊलींचे पसायदानच पहा ना, ते म्हणतात, 

दूरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात।।

आपल्या सभोवती, परिसरात, गावात, शहरात, देशात, जगात काहीही वाईट घडत असले, तर आपले संवेदनशील मन विव्हळते. मनोमन आपले हात त्या दीनांसाठी जोडले जातात. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होवो, अशी आपण प्रार्थना करतो. तीच भावना माऊली पसायदानात व्यक्त करतात. फरक एवढाच, की आपण चांगल्या लोकांचे भले होवो म्हणून प्रार्थना करतो, परंतु माऊली वाईट लोकांचेही भले होवो, असे म्हणतात. त्यांच्या आयुष्यातील तिमीर म्हणजे अंधार दूर झाला, तर लख्ख प्रकाशात वाईट काम करण्यासाठी ते धजावणार नाहीत. इतर लोकांप्रमाणे तेही सन्मार्गाला लागतील. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

याठिकाणी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी, की आईला आपली सगळी लेकरे सारखी असतात. मुल हुशार असो किंवा ढ, गरीब असो नाहीतर श्रीमंत, सुदृढ असो नाहीतर आजारी, ती प्रत्येकावर समान माया करते. तोच भाव संत ज्ञानेश्वरांच्या ठायी दिसून येतो, म्हणूनच तर त्यांना 'माऊली' म्हटले जाते. त्या वत्सल भावनेने ते दुरितांचे तिमिर जावो, असे म्हणत आहेत. 

माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म. सद्यस्थितीत प्रत्येकाला त्याचाच विसर पडत चालला आहे. परंतु, आपण सगळे देहाने वेगवेगळे असलो, तरी आत्मा एकच आहोत. आपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सूर्य ज्याप्रमाणे तळपत राहतो, तसा सत्वृत्तीने सारा समाज उजळू निघेल. सर्व प्राणीमात्रांना परस्परांप्रती स्नेह, भूतदया, प्रेम वाटले पाहिजे आणि मैत्र, सख्य निर्माण झाले पाहिजे. 

वर्षत सकळमंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,अनवरत भूमंडळी, भेट तू भूता।।

'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' ही आपल्या संतांची शिकवण आहे. प्रत्येक जिवात्म्यामध्ये ईश्वराचा वास आहे, ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याप्रती वाईट विचार मनात येत नाहीत. असे अशी सद्भावना निर्माण झाली, की रामराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. हा समाज, जणू ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाटू लागेल. 

चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,बोलते जे अर्णव, पियुषाचे।।

कल्पतरू म्हणजे असा वृक्ष, जो सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि चिंतामणी म्हणजे असा मणी, जो आपण जे चिंतन करू, त्या गोष्टींची पूर्तता करतो. माऊली म्हणतात, ज्यावेळी समाजात भूतदया निर्माण होईल, त्यावेळी ते गावच चिंतामणींनी युक्त असेल. तिथे कल्पतरुंचे आरव म्हणजे आवाज असतील. कल्पतरूंच्या रूपाने चैतन्य सळसळत असेल. हर तऱ्हेने केवळ समृद्धी तेथे वास करेल. तसेच पियुषांचे अर्णव म्हणजे अमृतसागर असेल, अशा ठिकाणी कोणाचीच, कुठलीच उपेक्षा होणार नाही. 

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन,ते सर्वाही सदासज्जन, सोयरे होतु।।

माऊलींचे काव्य लालित्य येथे ठळकपणे दिसून येते. जे सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही, ती दूरदृष्टी कवींच्या ठायी असते. माऊलीसुद्धा त्याच दूरदृष्टीने म्हणतात, अशा कल्पतरुंच्या गावात योगीजनांचा एवढा सुकाळू असेल, की तिथले लोक सूर्यासारखे ज्ञानाने तळपणारे असतील, परंतु त्यांच्या प्रखरतेचा कोणालाही त्रास होणार नाही. तिथले लोक स्वभावाने चंद्रासारखे शीतल असतील, परंतु, त्यांच्या चारित्र्यावर कोणतेही लांछन नसेल. त्यामुळे आपोआपच सर्वांची सोयरीक जुळलेली असते. सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील. हेच पुढच्या ओवीत माऊली सांगतात. त्याचा भावार्थ पुढच्या भागात पाहू...!

जय हरी माऊली!

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात कोणता जप, कसा आणि किती करावा?

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना