शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 15, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म.

ठळक मुद्देआपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सर्वांची सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत वाङमयाची ताकदच एवढी आहे, की ते वाचताना आपण आपल्या मनाशी हितगुज करत आहोत की काय, असा भास होतो. आता माऊलींचे पसायदानच पहा ना, ते म्हणतात, 

दूरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात।।

आपल्या सभोवती, परिसरात, गावात, शहरात, देशात, जगात काहीही वाईट घडत असले, तर आपले संवेदनशील मन विव्हळते. मनोमन आपले हात त्या दीनांसाठी जोडले जातात. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होवो, अशी आपण प्रार्थना करतो. तीच भावना माऊली पसायदानात व्यक्त करतात. फरक एवढाच, की आपण चांगल्या लोकांचे भले होवो म्हणून प्रार्थना करतो, परंतु माऊली वाईट लोकांचेही भले होवो, असे म्हणतात. त्यांच्या आयुष्यातील तिमीर म्हणजे अंधार दूर झाला, तर लख्ख प्रकाशात वाईट काम करण्यासाठी ते धजावणार नाहीत. इतर लोकांप्रमाणे तेही सन्मार्गाला लागतील. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

याठिकाणी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी, की आईला आपली सगळी लेकरे सारखी असतात. मुल हुशार असो किंवा ढ, गरीब असो नाहीतर श्रीमंत, सुदृढ असो नाहीतर आजारी, ती प्रत्येकावर समान माया करते. तोच भाव संत ज्ञानेश्वरांच्या ठायी दिसून येतो, म्हणूनच तर त्यांना 'माऊली' म्हटले जाते. त्या वत्सल भावनेने ते दुरितांचे तिमिर जावो, असे म्हणत आहेत. 

माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म. सद्यस्थितीत प्रत्येकाला त्याचाच विसर पडत चालला आहे. परंतु, आपण सगळे देहाने वेगवेगळे असलो, तरी आत्मा एकच आहोत. आपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सूर्य ज्याप्रमाणे तळपत राहतो, तसा सत्वृत्तीने सारा समाज उजळू निघेल. सर्व प्राणीमात्रांना परस्परांप्रती स्नेह, भूतदया, प्रेम वाटले पाहिजे आणि मैत्र, सख्य निर्माण झाले पाहिजे. 

वर्षत सकळमंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,अनवरत भूमंडळी, भेट तू भूता।।

'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' ही आपल्या संतांची शिकवण आहे. प्रत्येक जिवात्म्यामध्ये ईश्वराचा वास आहे, ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याप्रती वाईट विचार मनात येत नाहीत. असे अशी सद्भावना निर्माण झाली, की रामराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. हा समाज, जणू ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाटू लागेल. 

चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,बोलते जे अर्णव, पियुषाचे।।

कल्पतरू म्हणजे असा वृक्ष, जो सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि चिंतामणी म्हणजे असा मणी, जो आपण जे चिंतन करू, त्या गोष्टींची पूर्तता करतो. माऊली म्हणतात, ज्यावेळी समाजात भूतदया निर्माण होईल, त्यावेळी ते गावच चिंतामणींनी युक्त असेल. तिथे कल्पतरुंचे आरव म्हणजे आवाज असतील. कल्पतरूंच्या रूपाने चैतन्य सळसळत असेल. हर तऱ्हेने केवळ समृद्धी तेथे वास करेल. तसेच पियुषांचे अर्णव म्हणजे अमृतसागर असेल, अशा ठिकाणी कोणाचीच, कुठलीच उपेक्षा होणार नाही. 

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन,ते सर्वाही सदासज्जन, सोयरे होतु।।

माऊलींचे काव्य लालित्य येथे ठळकपणे दिसून येते. जे सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही, ती दूरदृष्टी कवींच्या ठायी असते. माऊलीसुद्धा त्याच दूरदृष्टीने म्हणतात, अशा कल्पतरुंच्या गावात योगीजनांचा एवढा सुकाळू असेल, की तिथले लोक सूर्यासारखे ज्ञानाने तळपणारे असतील, परंतु त्यांच्या प्रखरतेचा कोणालाही त्रास होणार नाही. तिथले लोक स्वभावाने चंद्रासारखे शीतल असतील, परंतु, त्यांच्या चारित्र्यावर कोणतेही लांछन नसेल. त्यामुळे आपोआपच सर्वांची सोयरीक जुळलेली असते. सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील. हेच पुढच्या ओवीत माऊली सांगतात. त्याचा भावार्थ पुढच्या भागात पाहू...!

जय हरी माऊली!

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात कोणता जप, कसा आणि किती करावा?

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना