बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 02:42 PM2021-05-19T14:42:49+5:302021-05-19T14:49:23+5:30

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

The young man ended his life fed up with unemployment; The family in trouble after the death of two men in two months | बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते अपघाती निधन संचारबंदी लागू झाल्याने युवकाचा रोजगार बंद पडला

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-: वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली. त्यात लॉकडाऊनमुळे काम मिळेना.त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च,घरात चार माणसांचा उदरनिर्वाह ही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने सोमवारी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली.सगळं काही सुरळीत सुरू होत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहन चालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश  व दोन मुली असा परिवार होता.वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जवाबदारी आकाश च्या खांद्यावर आली.तो बांधकामावर सेंटरिंग चे काम करत होता.तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागले.परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे बांधकामे ही ठप्प राहिली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही कामे मिळेनात. आई ही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च.लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाची दैनंदिन भेडसावू लागली.

चार जणांचे कुटूंब, घरात बसून कसे चालवायचे ? याची मोठी विवंचना आकाशला भेडसावू लागली. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत. या नैराश्यातून आकाशने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन बेरोजगारी व उपासमारीचा तो बळी ठरला.आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधार ही निघुन गेला.आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.

सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करा
सावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एका पाठोपाठ निघून गेले.आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे.
 

Web Title: The young man ended his life fed up with unemployment; The family in trouble after the death of two men in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.