शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

चार वर्षांतच आटले का बहीण-भावातील प्रेम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:09 IST

राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे.

- सतीश जोशी

राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे. भारतीय संस्कृतीत नात्यांना प्रतिष्ठा आहे आणि काही अपवाद सोडले तर ती आजही जपली जाते. केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात परतताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अख्खा देश हळहळला. कष्टकरी, वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गोपीनाथरावांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राला  धक्कादायक होते.

या आघाताने मुंडे कुटूंब तर संपूर्णत: कोसळले होते. मुंडे कुटुंबियांना धीर देण्यासाठी सर्व राजकीय पक्षासह अख्खा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा टाकला होता. आपल्या बाबांचे कार्य पुढे नेण्यासाठी पंकजा, डॉ. प्रीतम आणि यशश्री या भगिनींनी स्वत:ला सावरले. गोपीनाथरावांमुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली. अतिशय भावनिक झालेला बीड जिल्हा तर स्वत:च्या लेकीसाठी काहीही करायला तयार होता. लोकसभा निवडणुकीनंतर युती तुटली असताना देखील उद्धव ठाकरे यांनी पंकजा, प्रीतम माझ्या बहिणी आहेत, प्रीतमविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार नाही, अशी जेव्हा घोषणा केली, तेव्हा अख्या महाराष्ट्रातच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बहिणीवरील प्रेम सत्कारणी लागले आणि विक्रमी मतांनी प्रीतम मुंडे विजयी झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतरही परळीत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध उमेदवार दिला नाही आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा उद्धव-पकंजांच्या बहिण-भावांच्या नात्याची वाहवा केली.

कौटुंबिक कलहात एक भाऊ दूर झाला असताना उद्धव यांच्या रुपाने मुंडे भगिनींना एक नवीन भाऊ मिळाला होता. या नात्याचा पुन्हा पुन्हा अविष्कार महाराष्ट्राला पहावयास मिळाला. बहिणीवरील हे प्रेम इतके उफाळून आले होते की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजाला एक तासासाठी मुख्यमंत्री करा, आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल, असे वक्तव्य करून वंजारा समाजालाही आपलेसे करण्याचा उद्धव यांनी प्रयत्न केला होता. मंगळवारी बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना अख्खा बीड जिल्हा भगवामय करण्याची घोषणा करताना पकंजा आणि डॉ. प्रीतम मुंडे भगिनीविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. अवघ्या चार वर्षातच असे काय घडले की बहिणभावांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, बहिणीवरील प्रेम चार वर्षातच आटले का? असा प्रश्न जिल्ह्यास, महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेनेच्या काही सरदारांनी जिल्हातील सर्व जागा पक्ष लढविणार असल्याचे काही महिन्यापूर्वी सुतोवाच केले होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आणखी एका भावाने बहिणीची साथ सोडताना पहिल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवले असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण