शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

युट्युबने केली कमाल, दुष्काळी बीडमध्ये बहरली सफरचंदाची बाग; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 12:43 IST

माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली असून या झाडांना चांगली फळे देखील आली आहेत.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (जि.बीड) : श्रीमंतांपासून गरिबांपर्यत खाल्ले जाणारे सफरचंद हे केवळ थंड हवेच्या ठिकाणीच येत असे. यामुळे महाराष्ट्रात कोणीच सफरचंदाच्या बागेकडे वळत नव्हते. परंतु आता विशिष्ट तापमानात येणाऱ्या सफरचंदाच्या बागा महाराष्ट्रातही फुलू लागल्या आहेत. याला दुष्काळी बीड जिल्हाही मागे राहिलेला नाही. माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली असून या झाडांना चांगली फळे देखील आली आहेत.

माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सीताराम सजगणे व बाळासाहेब सीताराम सजगणे या दोन भावात मिळून ४० एकर शेती आहे. यातील सुरेश सजगणे यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले असताना ते आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पूर्वी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस अशी पिके घेतली जात. त्यानंतर शेतात माजलगाव धरणावरून पाईपलाईन करून व शेतात बोअरवेल घेत उसाची शेती केली.

कोरोनाकाळात निवांत वेळ असल्याने मोबाईल हे करमणुकीचे साधन बनले होते. यूट्यूबवर सुरेश सजगणे हे वेगवेगळी फळ शेती व इतर पिकांची माहिती पाहत बसत असत. मे २०२० मध्ये त्यांनी सफरचंदाची बाग पाहिली. त्यामुळे त्यांना आपण सफरचंदाची फळबाग करून पाहावी असे वाटले. त्यानंतर हरिमन शर्मा (दिलासपूर, हिमाचल प्रदेश) यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. सजगणे यांनी आपल्याकडील जमिनीचा प्रकार, तापमान, हवामानासह भौगोलिक माहिती शर्मा यांना दिली. त्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या शेतात एच.आर.एम.एन. या जातीची सफरचंदाची झाडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात असे सांगितले.

सजगणे यांनी मोठ्या धाडसाने सफरचंदाची ६०० रोपे ऑनलाईन मागवली. यापैकी त्यांनी ४०० रोपे आपल्या दीड एकर शेतात १२ बाय १५ अंतरावर डिसेंबर २०२० मध्ये लावली. बाकीची २०० रोपे त्यांनी मामाला दिली. सफरचंदाची लागवड केल्यानंतर अनेकांनी आम्हाला नावही ठेवले होते. परंतु आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. आता परजिल्ह्यातून शेतकरी बाग पाहण्यासाठी येत आहेत. सफरचंदाच्या सर्व झाडांना ड्रीप करून चार-पाच दिवसांनी पाणी दिले तरी चालते. त्याचबरोबर फवारणी व खताचा खर्च जास्त नाही. सफरचंदाच्या झाडाला जानेवारी महिन्यात फुले येतात. त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी फळे लागायला सुरुवात होते. तर जून, जुलैमध्ये फळ तयार होते, अशी माहिती शर्मा यांनी आम्हाला दिली होती. यानुसार ही झाडे आम्ही जोपासली आहेत. सफरचंदाच्या शेतात मागील दीड वर्षात टरबूज, मिरची व झेंडू अशी तीन पिके घेऊन जवळपास सहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. त्यात सर्व खर्च वजा जाता चार लाख रुपये उरले, असे सुरेश सजगणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी केवळ उसाच्या पाठीमागे न लागता वेगवेगळ्या फळबागा लावण्यावर भर द्यावा. ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरच पडेल. सफरचंदाच्या बागेत आम्ही दीड वर्षातील आंतरपीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवले आहे.- सुरेश सजगणे, सफरचंद उत्पादक शेतकरी.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी