शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

दिव्यांगांचा ५ टक्के निधी कधी खर्च होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:09 AM

दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत स्वत:च्या उत्पन्नातून आरक्षित केलेला निधी तीन वर्षांपासून अखर्चित असून, आता विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत स्वत:च्या उत्पन्नातून आरक्षित केलेला निधी तीन वर्षांपासून अखर्चित असून, आता विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळेल का? असा सवाल केला जात आहे.दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी एकूण ३ टक्के आरक्षित निधीची तरतूद करण्याबात जून २०१८ पूर्वीचे शासन निर्देश अंमलात होते. त्यानंतर पूर्वीचे हे शासकीय निर्देश रद्दबातल करु न २५ जून २०१८ रोजी तीन टक्के निधी ऐवजी एकूण ५ टक्के निधी आरक्षित करण्याबाबत शासन निर्णय झाला. हा निर्णय निर्गमित करु न सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे.यानुसार बीड जिल्हा परिषदेने दिव्यांग व्यक्तींकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण ुउत्पन्नाच्या आधारे ५ टक्के निधीच्या स्वरु पात जवळपास ७३ लाख रुपयांची तरतूद केली. याला चार महिने होत आहेत. तसेच या पूर्वीची आर्थिक वर्षातील तरतूद केलेली २०१५-१६ मधील जवळपास ४० लाख आणि २०१६-१७ मधील ३८ लाख रुपये अद्यापही खर्च झालेले नाही. २०१७-१८ मध्ये या निधीची तरतूद करुन तसेच १४४ लाभार्थ्यांची निवड करुनही अद्याप ब-याच दिव्यांग व्यक्तींना थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत निधीचा लाभ मिळालेला नाही. हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहचून शासन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास पदाधिकारी आणि प्रशसनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे बोलले जाते. वास्तविक पाहता शासन निर्णय असताना पदाधिकारी व त्यांच्या बगलबच्च्यांमुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे येत असल्याने दिव्यांग व्यक्तींना लाभासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.असे आहेत शासन निर्देशजिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वत:च्या उत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत राखीव ठेवावा. एखाद्या आर्थिक वर्षात दिव्यांगासाठीचा निधी खर्च जाला नाही तर ही रक्कम जिल्हा परिषदेच्या अपंग कल्याण निधीत जमा करावी. तसेच या निधीतून राबवावयाच्या सामूहिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाने २५ जूनच्या निर्णयात नमूद केलेल्या आहेत.गटविकास अधिकाऱ्यांना पत्रदिव्यांग व्यक्तींच्या या अखर्चित निधीबाबत जिल्हा समाजकल्याण विभागाने सर्व गटविकास अधिका-यांना पत्र पाठविले आहे. मागील वर्षीचा निधी अखर्चित असे तर मुख्य कार्यकारी अधिका-यांची परवानगी घ्यावी. तसेच त्याआधीचा निधी अखर्चित असेल तर तो अपंग कल्याण जिल्हा निधीमध्ये जमा करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना