शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 4:46 PM

निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले.

बीड : वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये, यासह निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. बीडजवळ पालवन परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या वृक्षसंमेलनाच्या समारोपावेळी सह्याद्री देवराई संस्थेचे धनंजय शेडबाळे यांनी या ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

वृक्ष संमेलनात निसर्ग संवर्धनासाठी ठराव1. महाराष्ट्रातील परंपरागत जपलेल्या देवराया संरिक्षत म्हणून जाहीर करून त्यांचे संवर्धन करावे2. वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर, कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये?3. महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेनुसार जे वातावरणीय विभाग पडतात त्या भागांतील स्थानिक वृक्ष, वनस्पती यांचाच वृक्षारोपणात समावेश करावा4. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे आणि ताम्हण (जारूळ) राज्यफुल आहे. ही दोन्ही झाडे राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय परिसरात लावण्यात यावीत.5. राज्यातील सर्व गवताळ कुरणे, पाणथळ जागा, तळी यांचे     संरक्षण करावे आणि संवर्धन करावे. 6. राज्यातील सर्व शहरे, गावांत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे आणि सर्व सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी रोपे, झाडे लावून ते वाढवण्यासाठी वापरात आणावे. 7. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वाणाचे (जसे धान्य, वृक्ष, वनस्पती, भाज्या, कडधान्ये, गवत इत्यादी) बीजसंकलन करून त्याची सिडबँक तयार करावी व त्याचे संवर्धन करावे.8. वाढते शहरीकरण, विकास कामे, संरक्षित वनात रस्त्यांचे विस्तारीकरण, रु ंदीकरण, घाटरस्ते आदी कारणांमुळे जंगले तुटली आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. त्यांच्यासाठी हक्काचे वाइल्ड कॉरिडोर शासनाने त्वरित करावेत. 9. शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना देशी रोप देऊन ते वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे. त्या रोपांचा दरवर्षी आढावा घ्यावा. शेवटच्या वर्षी त्याला यासाठी खास गुण द्यावेत. 10. राज्यातील सध्या बहुतेक सर्व शाळांमधून परदेशी वृक्ष (गुलमोहर, अशोक, निलिगरी वगैरे) लावलेले आहेत. इथून पुढे फक्त देशी वृक्ष (उदा. बहावा, बकुळ, पारिजातक, ताम्हण वगैरे) लावावेत. 11. राज्यातील प्रत्येक तालुक्यात जैवविविधता उद्यान उभे करावे.

टॅग्स :Beedबीडenvironmentपर्यावरणsayaji shindeसयाजी शिंदे