शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

सीईटी होवो अथवा नाही, बीड जिल्ह्यात अकरावीच्या ४ हजार जागा राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ...

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी राज्य मंडळ व अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण, प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा २० जुलैपासून उपलब्ध केली. मात्र त्यानंतर तांत्रिक कारणामुळे हे संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे. ते सुरू होईल तेव्हा होईल; मात्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीची तयारी सुरू केली आहे.

दहावी पास विद्यार्थी - ४०,५२२

अकरावीसाठी एकूण जागा - ४४,६४०

कला शाखा - २२,५६०

वाणिज्य शाखा - १,७६०

विज्ञान शाखा - १७,७६०

संयुक्त (कला, वाणिज्य) २,५६०

सीईटी वेबसाईट हँग

इयत्ता ११ वी प्रवेशपूर्वपरीक्षेसाठी २६ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे ११ वीत प्रवेशासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र दहावीच्या निकालाप्रमाणेच येथेही अनुभव आला. संकेतस्थळ सुरू होत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळ बंद केले असून, ते सुरू केल्यानंतर अर्ज भरण्यास पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

सीईटीची तयारी कशी कराल?

इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्नांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न असतील, परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची दुय्यम प्रत मिळणार असल्याचे सांगण्यात येते.