शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

गेवराईत अवैध वाळू वाहतुकीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:19 AM

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गेवराईकडे दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिली. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पाढंरवाडी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. बंदी असतानाही सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीवरील मुलीला चिरडले

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गेवराईकडे दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिली. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पाढंरवाडी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी घडली.दरम्यान, प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतुकीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. बंदी असतानाही सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.निकिता (१६ रा.कोमलवाडी ता.गेवराई) असे मयत मुलीचे नाव असून रामदास जाधव असे तिच्या जखमी पित्याचे नाव आहे. निकिता ही पित्यासोबत गुरुवारी सकाळी गावाकडून गेवराईकडे येत होते.ते पाढंरवाडी फाट्याजवळ आले असता त्याच वेळी अवैध वाळूने भरून भरधाव येणाºया विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जाधव यांच्या दुचाकीला पाठिमागून जोराची धडक दिली. यावेळी निकिता उडून ट्रॅक्टरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर रामदास जाधव हे गंभीर जखमी झाले. यावरही ट्रॅक्टर न थांबल्याने ते बाजुलाच असलेल्या गॅरेजमध्ये शिरले. सुदैवाने येथे कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रॅक्टर थांबताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गेवराई पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची ठाण्यात नोंद झालेली नव्हती.दरम्यान, वाळू माफियांवर कारवायांसाठी प्रशासन आता कडक पाऊले उचलणार की आणखी बळी जाण्याची वाट पाहणार हे येणारी वेळच ठरवेल.गोदापात्रातून अवैध वाळू उपसासध्या गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाळू वाहतूक करणारे टॅक्टर शहरात राजरोजपणे दिवसरात्र भरधाव वेगाने धावताना दिसतात. कारवाईच्या भितीपोटी धावणाºया अशा वाहनांमुळेच निकितासारख्या निष्पाप मुलींचा बळी जात आहे. ही वाहतूक बंद असती तर हा अपघात टळला असता, अशी चर्चा शहरात सुरू होती. ही वाहतूक बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सुनिल ठोसर यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूAccidentअपघात