नागापूर येथील वाण धरण तुडुंब; परळीकरांचा पाणी प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:17+5:302021-07-24T04:20:17+5:30
नागापूर धरण भरत आल्याने परळी शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. ...

नागापूर येथील वाण धरण तुडुंब; परळीकरांचा पाणी प्रश्न मिटला
नागापूर धरण भरत आल्याने परळी शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. गेल्या पाच दिवसांपासून वाण धरणावरील गावात दमदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी या धरणात येणे सुरू झाल्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. हे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. परळी तालुक्यातील नागापूरच्या वाण धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या परळी शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. धरण भरत आल्याने आता परळीस दोन दिवसाआड नगर परिषदेने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते आश्विन मोगरकर यांनी केली आहे.
परळी तालुक्यातील बोधेगाव येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे तसेच शहराजवळ असलेल्या चांदापूर मार्गावरील घनशी नदीला पाणी आले आहे.
परळी ते चांदापूर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्यावतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर गुरुवारी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते जलपूजन झाले.
230721\23bed_3_23072021_14.jpg