शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

डोक्याइतके झाड; पण तुरीच्या शेंगाच लगडल्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:34 AM

गेवराई : वांझ तुरीच्या बियाण्यांमुळे तुरीला शेंगा लागल्या नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी ...

गेवराई : वांझ तुरीच्या बियाण्यांमुळे तुरीला शेंगा लागल्या नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे दिली होती. त्यावर नेमलेल्या तालुकास्तरीय समितीने प्रत्येक शेताची पाहणी करून तूरपिकाला ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेंगा लगडल्या नसल्याने यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाहणी अहवालात नमूद केले आहे. झाड डोक्याइतके वाढले; पण शेंगाच लगडल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील एका कृषी साहित्य दुकानातून महाबीज सीडस कंपनीच्या ‘बीडीएन ७११’ या तूर बियाण्यांच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. १९ जून रोजी त्यांनी शेतामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली होती. तसेच या तुरीला विविध खते, औषधे फवारणी देण्यात आली. मात्र तब्बल सहा महिने लोटले तरी सध्या स्थितीत तूरपीक डोक्याएवढे वाढले, मात्र शेंगाच आल्या नाहीत. तसेच शेजाऱ्यांच्या तुरीचे खळे होऊन विक्री झाल्याने टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे २८ डिसेंबर रोजी प्रथम बियाण्यांची रीतसर तक्रार केली. त्यानुसार १९ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र खामगावचे हनुमान गरुड, पंचायत समितीचे पुरी, संदीप देशमुख, आर. आर. चव्हाण, महाबीज कंपनीचे धस, कृषी मंडळ अधिकारी दीपक राठोड यांच्या तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष शेतात पाहणी केली. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये पिकाच्या परिपक्वता कालावधीत संपूर्ण क्षेत्रांमध्ये फरक दिसून आल्याचे नमूद करीत एक एकर क्षेत्रात ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.