शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

प्रवासी हा एसटीचा अन्नदाता : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:53 PM

प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

ठळक मुद्देबीड बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन : एसटीचे रुपडे बदलत असल्याचा दावा

बीड : प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.बीड शहरातील बीड बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री रावते बोलत होते.मंचावर आदित्य ठाकरे यांच्यासह रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. राहुल पाटील सचिन आहिर, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, विभागीय नियंत्रक जालींदर सिरसाठ, यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर आदींची उपस्थिती होती.पुढे रावते म्हणाले, मराठवाड्यात ३०, तर राज्यात १९५ ठिकाणी रापमची कामे सुरू आहेत. स्थानकांमध्ये सुविधा देण्यासह बस गाड्यांचे रूप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे आतापर्यंत ५० वर्षांत कधी झाले नाही, ते आता साडेचार वर्षात शिवसेना करून दाखवित आहे.जिल्ह्यात बीडसह नेकनूर, कडा, आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा येथेही काम सुरू आहे. राज्यात आणखी ६०० ठिकाणी कामे करण्याचा संकल्प आहे. रापमच्या कर्मचारी वसाहतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. कुर्ला येथे १००० घरे कर्मचाऱ्यांसाठी बांधले जाणार आहेत. तसेच कर्मचाºयांच्या मुलांना मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र रूग्णालय असावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रावते म्हणाले. आभार यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर यांनी मानले.नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य ठाकरेयुवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले, नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी सध्या शिवसेना प्रयत्न करीत आहे. आम्ही आदित्य संवाद यात्रा सुरू केली. ग्रामीण भागात जाऊन महिला, मुलींची प्रश्न जाणून घेतले. नुसते प्रश्न जाणून घेत नाहीत, तर त्याचे निरसनही केले जात आहे. एसटीच्या संदर्भातील प्रश्नांवर आपण परिवहन मंत्र्यांना निवेदने देणार आहोत. तसेच महाराष्ट्राला दुष्काळ, कर्जमुक्त करून सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दुष्काळमुक्तीसाठी नद्यांमध्ये पाणी आणावे - जयदत्त क्षीरसागररोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. मात्र, बीड जिल्हा अद्यापही कोरडाच आहे. जिल्ह्यात सध्या ६०० टँकरने पाणी पुरवठा होत आहे. परंतु मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. समुद्रात जाणारे पाणी अडवून गोदावरी, सिंदफणा नद्यांमध्ये सोडावे. हेच पाणी दुष्काळी भागात द्यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीDiwakar Raoteदिवाकर रावतेAditya Thackreyआदित्य ठाकरेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर