शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आज ४४ हजार विद्यार्थी देणार जिज्ञासा कसोटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:19 AM

जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी (३० एप्रिल) रोजी होत असून ४४ हजार ४२९ विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे अनुमान काढले जाणार आहे.खबरदारी घ्या, उन्हापासून बचाव करासर्व शाळांतील चौथी व सातवी वर्गाच्या शिक्षकांनी मुलांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत आणण्याचे व परत घरी पोहचविण्याचे योग्य ते नियोजन करावे. उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ आदी आवश्यक साहित्य विद्यार्थी व शिक्षकांनी सोबत ठेवणे, परीक्षा केंद्रावर संचालकांनी विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याच्या जारची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था सावलीतच करावी. आवश्यकता असल्यास मंडप उभारावा, विद्यार्थी उन्हामध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, वर्गात पंख्यांची पुरेशी व्यवस्था करावी, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत लेखी कळवावे, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर एक कक्ष स्थापन करुन प्रत्येक केंद्रावर सूचनेनुसार व्यवस्थेचा आढावा घेण्याचे कळविले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.कशासाठी परीक्षा ?शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, व्यवहार ज्ञान, सामान्य ज्ञान व बौध्दिक विकास करणे, तसेच पाठ्यपुस्तकातील शिक्षणा बरोबरच सभोवतालच्या घटना, निसर्ग, पर्यावरण, निरीक्षण, आकलन करुन जिज्ञासा वाढविणे, प्रयोग, प्रात्यक्षिकाद्वारे व्यवहारातील गोष्टी समजून घेणे, यासाठी बीड जिल्हा परिषद ‘विद्यार्थी जिज्ञासा कसोटी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असून, याचे निश्चितच चांगले परिणाम मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.ओएमआर पद्धतीने तपासणीजिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता चौथीचे ३१ हजार ७२७ विद्यार्थी १६४ केंद्रावर, तर इयत्ता सातवीचे १२ हजार ७०२ विद्यार्थी १५९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.३० एप्रिल रोजी सकाळी ९. ३० ते ११.३० व दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत विद्यार्थी आकलन कसोटी व विद्यार्थी सामान्य, व्यवहार ज्ञान कसोटी असे दोन पेपर आहेत.प्रत्येकी २०० गुणांची परीक्षा असून परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे आहे.प्रश्नपत्रिका सर्व तालुक्यात वितरीत झाल्या असून ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी