शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

तीन महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत जवळपास ५० शेतकऱ्यांनी विविध कारणांस्तव आत्महत्या ...

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत जवळपास ५० शेतकऱ्यांनी विविध कारणांस्तव आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मागील वर्षी १ जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर जवळपास १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यापैकी जवळपास ६० प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून, ८८ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १ लाखाची मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. मात्र, त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीमधील नवनवीन होत असलेले बदल करण्याची इच्छा असतानादेखील योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत.

नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. यासाठी शासनाकडून उपाययोजना राबवल्या जातात. आत्महत्या केल्यानंतर ती पात्र ठरली तर, त्यांच्या कुटुंबाला १ लाख रुपये व इतर योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, विविध विभागांकडून देण्यात येणारा लाभ मागील वर्षापासून फार कमी प्रमाणात दिल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे हे जिल्ह्यासमोरील आव्हान असून, यासंदर्भात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी विशेष योजना राबवण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधींचे शेतकरी आत्महत्येकडे दुर्लक्ष

शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून बीडला कलंक लागलेला आहे. मात्र, तो पुसण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपययोजनांच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून, यासंदर्भात शासनस्तरावरून विशेष उपाययोजना राबवण्यासंदर्भात त्यांनी शासनाला सुचवण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे.

महिना आत्महत्या

जानेवारी १४

फेब्रुवारी १६

मार्च १९

एकूण ५०