शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

तीन महिन्यांत ५० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत जवळपास ५० शेतकऱ्यांनी विविध कारणांस्तव आत्महत्या ...

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांत जवळपास ५० शेतकऱ्यांनी विविध कारणांस्तव आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मागील वर्षी १ जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर जवळपास १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यापैकी जवळपास ६० प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून, ८८ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १ लाखाची मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. मात्र, त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतीमधील नवनवीन होत असलेले बदल करण्याची इच्छा असतानादेखील योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीवर अवलंबून आहेत.

नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासह इतर अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. यासाठी शासनाकडून उपाययोजना राबवल्या जातात. आत्महत्या केल्यानंतर ती पात्र ठरली तर, त्यांच्या कुटुंबाला १ लाख रुपये व इतर योजनांचा लाभ दिला जातो. मात्र, विविध विभागांकडून देण्यात येणारा लाभ मागील वर्षापासून फार कमी प्रमाणात दिल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे हे जिल्ह्यासमोरील आव्हान असून, यासंदर्भात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी विशेष योजना राबवण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधींचे शेतकरी आत्महत्येकडे दुर्लक्ष

शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून बीडला कलंक लागलेला आहे. मात्र, तो पुसण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपययोजनांच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून, यासंदर्भात शासनस्तरावरून विशेष उपाययोजना राबवण्यासंदर्भात त्यांनी शासनाला सुचवण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले आहे.

महिना आत्महत्या

जानेवारी १४

फेब्रुवारी १६

मार्च १९

एकूण ५०