शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्य वितरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:36 AM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थी प्रति व्यक्तीस ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थी प्रति व्यक्तीस तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मे व जूनमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य, तसेच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य (तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ) मे या एका महिन्यासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य मिळणार नसून दरमाहप्रमाणे मिळणारे धान्यच मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे.

१० मे नंतर मे महिन्याचे धान्य वाटप होणार आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदार यांचा अंगठा लावून धान्य वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस मशिनवर या महिन्यात अंगठा घेण्याची आवश्यकता नाही. धान्य वाटप करताना दुकानदार व लाभार्थी यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, आदी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी कोविड-१९ चे सर्व नियम पाळून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष सय्यद शाकेर, तहसीलदार वंदना शिडोळकर व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे

शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य मिळणार नसून दरमाहप्रमाणे मिळणारे धान्यच मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे. मे महिन्याचे धान्य वाटप होणार आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदार यांचा अंगठा लावून धान्य वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा घेण्याची आवश्यकता नाही. धान्य वाटप करताना दुकानदार व लाभार्थी यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, आदी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी कोविड-१९ चे सर्व नियम पाळून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष सय्यद शाकेर तहसीलदार वंदना शिडोळकर व नायबतहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.