शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:43 IST

तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला.

ठळक मुद्देपंचायत समितीसमोर आंदोलन : पालक, शिक्षकांनीही घेतला आंदोलनात सहभाग

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला. शाळा प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात असलेल्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेली हेळसांड यामुळे विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पंचायत समिती आवारात बुधवारी पहावयास मिळाले. रात्री उशिरापर्यंत मुलांचे आंदोलन सुरुच होते.ग्रामपंचायत मंजरथ ही मागील ग्रामपंचायत निवडणुकीपासून कायम वादातीत असून, या-ना त्या कारणामुळे सातत्याने ग्रामपंचायतच्या कारभारावरून खटके उडत आहेत. सरपंच ऋतुजा आनंदगावकर या एका कंपनीत काम करीत असून, त्या कधीच गावात हजर नसतात. त्यांच्या जागी त्यांचे वडील राजेंद्र आनंदगावकर हेच काम पाहत असल्याने ग्रामपंचायतचा कारभार पार ढासळल्याचा आरोप विरोधक कायम करीत असतात. सरपंचानी एकतर नोकरी करावी किंवा राजकारण करावे. सरपंच जागेवर नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात त्यांच्या नातेवाईकांकडून होत असलेली मनमानी वादास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत असतात. तसेच पूर्वीच्या ग्रा.प. पदाधिकाऱ्यांचे उणेदुणे काढण्यासाठी नियमावर बोट ठेवून सरपंच नवनवीन वाद उपस्थित करीत असल्याचाही आरोप होतो. दुसरीकडे सरपंच या अ‍ॅरोनॉटिकल इंजिनिअर आणि त्यांचे वडील तसेच आई हे उच्चशिक्षित असल्याने प्रत्येक काम हे नियमानुसारच होईल, यासाठी आग्रही असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे गावकीचा हा वाद काही करता मिटत नसला तरी या सर्व प्रकाराची सामाजिक कार्याला लागण झाली नव्हती. मात्र महिन्यापूर्वी येथील गोदावरी विद्यालयाचे नळ कनेक्शन ग्रा.पं. ने तोडले त्याला सदरील कनेक्शन हे अनधिकृत असल्याचा निर्वाळा सरपंच यांनी दिला. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची पाण्याअभावी हेळसांड सुरू झाली. या शाळेत शिकणारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी हे आजूबाजूच्या गावांमधून तसेच वाड्या, वस्तीवरून येतात. दप्तरासोबत चार ते पाच लिटर पाणी देखील त्यांना वागवावे लागत असल्याने मुलांना चक्कर येणे, उलट्या होणे असे प्रकार घडू लागल्यामुळे पालक देखील चिंतातुर झाले. मागील महिन्यापासून चाललेल्या या प्रकाराला अखेर बुधवारी तोंड फुटले आणि या शाळेचे विद्यार्थी आणि पालकांनी थेट पंचायत समितीसमोर आम्हाला पाणी द्या म्हणत आर्त टाहो फोडला. यामुळे पंचायत समिती आवारात एकच धांदल उडाली. चार तास हा गोंधळ सुरू होता. यावेळी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, पोनि सय्यद सुलेमान, उपसभापती डॉ. वसीम मनसबदार यांनी मानवीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने नळ सुरू करून देऊन कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी, अशी मध्यस्थी केली. मात्र सरपंचांनी या लोकांना न जुमानता अधिकृत मागणी झाल्याशिवाय नळ सुरू करण्यात येणार नाही, अशी हेकेखोर भूमिका घेत तेथून काढता पाय घेतल्यामुळे शेवटी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकास नळ जोडणे तसेच कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून घेण्याचा आदेश द्यावा लागला. यावेळी आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक सामील झाले होते.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईStudentविद्यार्थीagitationआंदोलन