शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कामगिरी दमदार ! परिस्थितीवर मात करत बीडमधील ऊसतोड मजुरांची चार मुले बनली डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:51 IST

बीड जिल्ह्यातील शांतीवन संस्थेने स्वीकारले होते पालकत्व

बीड : ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडची चार मुले एमबीबीएसच्या अंतिम वर्षात यश संपादन करून डॉक्टर बनली आहेत. या चारही मुलांचे पालकत्व शांतीवन (आर्वी ता. शिरूर जि. बीड) या संस्थेने स्वीकारले होते. परिस्थितीवर मात करत मजुरांच्या मुलांनी यश संपादन केल्याने कौतुक होत आहे.

स्नेहल नागरगाेजे, रामदास चेपटे, किरण तोगे आणि रोहित चव्हाण अशी डॉक्टर बनलेल्या या चार मुलांची नाव आहेत. स्नेहल ही शिरूर तालुक्यातीलच खांबा लिंबा येथील रहिवासी. बारावीला असताना तिचे पालकत्व शांतीवनने स्वीकारले. नाशिक येथील यशवंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून तिने यश संपादन केले. रामदास हा देखील शिरूरमधील घुगेवाडीचा रहिवासी. बारावीनंतर याचे पालकत्व स्वीकारले. त्याने इस्लामपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले. किरणने पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमधून यश मिळविले. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटेवाडीचा रहिवासी आहे. राेहित हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केले. हे चौघेही परिस्थितीवर मात करून डॉक्टर बनले आहेत. आता त्यांनाही सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

उच्च शिक्षित मुलांसाठी तारांगण प्रकल्पशांतीवन या मुख्य संस्थेच्या अंतर्गत विविध प्रकल्प आहेत. त्यातीलच तारांगण हा एक आहे. १० वी नंतरच्या सर्व मुलांचे शिक्षण या प्रकल्पातून केले जाते. सध्या जवळपास १०० मुले उच्च शिक्षित आहेत. यात १६ वैद्यकीय शिक्षण घेत असून त्यापैकीच हे चौघे डॉक्टर बनले आहेत. तर इतर मुले आयटीआय, अभियांत्रिकी, नर्सिंग यासह वेगवेगळे कोर्स करत आहेत.

भान ठेवून काम करावेआमच्याकडील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी त्यांना सामाजिक भान ठेवून काम करण्याचे शिकविले जाते. ही चार मुले डॉक्टर बनल्याने आरोग्य सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. गरिबांची सेवा करावी, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तसेच समाजाप्रती चांगली भावना ठेवून सेवा देतील, असा विश्वास असल्याचेही शांतीवनचे संचालक कावेरी व दीपक नागरगोजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीMedicalवैद्यकीय