शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उद्ध्वस्त रानातली पिके पाहिली पथकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:28 IST

केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाची पाहणी। शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा घेतला आढावा, केंद्राला अहवाल देणार

बीड : केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पीक हातचे गेले. त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करु न केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी हे पथक आले होते. उद्ध्वस्त रान, नुकसान झालेल्या बाजरी, सोयाबीनचे ढिगारे, अजूनही शेतात साचलेले पाणी आणि उजाड फळबागा या पथकाने प्रातिनिधीक स्वरुपात पाहिल्या. इतर शेतकºयांचेही असेच नुकसान झाल्याचे संवाद करताना शेतकरी सांगत होते.आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव व्ही. थिरुप्पूगाझ व सदस्य डॉ. के. मनोहरन् यांच्या पथकासमवेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, विभागीय सहसंचालक (कृषी) एस के दिवेकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, आ. लक्ष्मण पवार आदि उपस्थित होते.गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे केंद्रीय पथकाने विलास कोटांबे यांच्या बाजरी पिकाची पाहणी करुन संवाद साधला. रांजणी येथे कुंडलिक जाधव यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. याच तालुक्यातील जळगाव मांजरा येथे दामोदर इजगे यांच्या शेतात कापूस पिकांची तसेच वाहेगाव आमला येथे अरु णा चव्हाण यांच्या शेतात पाहणी केली.यानंतर पथकाने माजलगाव येथे शिवाजीराव रांजवण यांच्या डाळिंब फळबागाची, तर प्रणिता रेवणवार यांच्या सोयाबीनची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार प्रतिभा गोरे आदी उपस्थित होत्या. लहामेवाडी येथे अल्लाउद्दीन खाजामिया यांच्या शेतात पाहणी करुन धारुर तालुक्यातील तेलगाव येथे उत्तमलाल कासलीवाल यांच्या शेतात सोयाबीन पीक पाहणी व संवाद केला. यावेळी तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर उपस्थित होते. त्यानंतर पथकाने वडवणी तालुक्यातील पुसरा येथे सोनाबाई वाव्हळ यांच्या बाजरी पिकांची तसेच मोरवड येथे माऊली शेळके यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी उपस्थित होत्या. तसेच बीड तालुक्यातील घाटसावळी येथे महादेव लांडे यांच्या बाजरी पिकाची तर जरुड येथे बाबासाहेब कोरडे यांच्या शेतातील कपाशी पिकांची पाहणी केली.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी