शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

भरधाव टेंपो उभ्या पिकअपवर धडकला;दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडून चालकाचा मृत्यू, १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 13:30 IST

अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीजवळ झाला अपघात

अंबाजोगाई - भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज शनिवारी पहाटे (दि.१९) दिड वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत

आजनी बु. येथील ठाकूर कुटुंबीय अन्य नातेवाईकांसह वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी पिकअप वाहनातून (एमएच २४ एबी ६६२४) अहमदनगरला निघाले होते. वाटेत बर्दापूरच्या पुढे आल्यानंतर नंदगोपाल डेअरीजवळ ते सर्वजण पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून उतरले. थोड्यावेळाने सर्वांना वाहनात बसवून पिकअप चालक ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर (वय ४२) हे मागील बाजूचा फालका लावत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेंपोने पिकअपला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही वाहनाच्या मध्ये चिरडून ज्ञानेश्वर ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप मधील उर्मिला उद्धव ठाकूर (४०), खंडू बळीराम खाणशेट्टी (४५), मुकेश उद्धव ठाकूर (१२), दैवाशाला ठाकूर (४०), रुख्मिनबाई नामदेव ठाकूर (६०), रुपाली गोविंद ठाकूर (११), रेणुका गोविंद ठाकूर (३९), कलावती बाजी येरांडे (४८), रावसाहेब शिंदे (४४), गजानन बालाजी शिंदे (२७), गंगाधर रामा कोरे (७०), अजय माधव शिंदे (१२), बालाजी मुक्ताराम ठाकूर (३७), कमलबाई ठाकूर (६०), ओंकार ज्ञानेश्वर ठाकूर (१५), मेघा ज्ञानेश्वर ठाकूर (३८), मनुबाई गणशेट्टी (७०), विष्णू ज्ञानेश्वर ठाकूर (१२) सर्व रा. आजनी बु. आणि अर्चना माधव शिंदे (३५, रा. घनसावरगाव) हे जखमी झाले. सध्या १२ जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून एकास लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघातानंतर टेंपोचालकाने घटनास्थळाहून टेंपोसह पळ काढला. 

अपघात आणि मृत्यूंची नियमित मालिकाअंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर ते सायगाव दरम्यान अपघातांची मालिका अखंडपणे सुरुच आहे. राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने या भागात सतत अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. रस्ता रुंदीकरण करण्याची तीव्र आवश्यकता आहे. किमान तोपर्यंत या भागात ठिकठिकाणी ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असे फलक तरी लावावेत जेणेकरून वाहनचालक अधिक सावधतेने वाहन चालवतील आणि अपघातांवर काही प्रमाणात का होईना नियंत्रण येईल.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडAccidentअपघात