शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

भरधाव टेंपो उभ्या पिकअपवर धडकला;दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडून चालकाचा मृत्यू, १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 13:30 IST

अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीजवळ झाला अपघात

अंबाजोगाई - भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज शनिवारी पहाटे (दि.१९) दिड वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत

आजनी बु. येथील ठाकूर कुटुंबीय अन्य नातेवाईकांसह वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी पिकअप वाहनातून (एमएच २४ एबी ६६२४) अहमदनगरला निघाले होते. वाटेत बर्दापूरच्या पुढे आल्यानंतर नंदगोपाल डेअरीजवळ ते सर्वजण पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून उतरले. थोड्यावेळाने सर्वांना वाहनात बसवून पिकअप चालक ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर (वय ४२) हे मागील बाजूचा फालका लावत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेंपोने पिकअपला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही वाहनाच्या मध्ये चिरडून ज्ञानेश्वर ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप मधील उर्मिला उद्धव ठाकूर (४०), खंडू बळीराम खाणशेट्टी (४५), मुकेश उद्धव ठाकूर (१२), दैवाशाला ठाकूर (४०), रुख्मिनबाई नामदेव ठाकूर (६०), रुपाली गोविंद ठाकूर (११), रेणुका गोविंद ठाकूर (३९), कलावती बाजी येरांडे (४८), रावसाहेब शिंदे (४४), गजानन बालाजी शिंदे (२७), गंगाधर रामा कोरे (७०), अजय माधव शिंदे (१२), बालाजी मुक्ताराम ठाकूर (३७), कमलबाई ठाकूर (६०), ओंकार ज्ञानेश्वर ठाकूर (१५), मेघा ज्ञानेश्वर ठाकूर (३८), मनुबाई गणशेट्टी (७०), विष्णू ज्ञानेश्वर ठाकूर (१२) सर्व रा. आजनी बु. आणि अर्चना माधव शिंदे (३५, रा. घनसावरगाव) हे जखमी झाले. सध्या १२ जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून एकास लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघातानंतर टेंपोचालकाने घटनास्थळाहून टेंपोसह पळ काढला. 

अपघात आणि मृत्यूंची नियमित मालिकाअंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर ते सायगाव दरम्यान अपघातांची मालिका अखंडपणे सुरुच आहे. राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने या भागात सतत अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. रस्ता रुंदीकरण करण्याची तीव्र आवश्यकता आहे. किमान तोपर्यंत या भागात ठिकठिकाणी ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असे फलक तरी लावावेत जेणेकरून वाहनचालक अधिक सावधतेने वाहन चालवतील आणि अपघातांवर काही प्रमाणात का होईना नियंत्रण येईल.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडAccidentअपघात