शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शाळा दुरुस्ती हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’- प्रीतम मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:27 AM

बीड जिल्ह्यातील विद्यामंदिरे ही चांगली, सुस्थितीत असली पाहिजेत. मुलांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जि.प.च्या मोडकळीस आलेल्या शाळा दुरुस्ती करणे हा आपल्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. येत्या १० दिवसात शाळा दुरुस्तीचा पुर्ण आढावा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी शाळा कायापालट समितीच्या बैठकीत दिला.

बीड : जिल्ह्यातील विद्यामंदिरे ही चांगली, सुस्थितीत असली पाहिजेत. मुलांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी जि.प.च्या मोडकळीस आलेल्या शाळा दुरुस्ती करणे हा आपल्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. येत्या १० दिवसात शाळा दुरुस्तीचा पुर्ण आढावा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी शाळा कायापालट समितीच्या बैठकीत दिला.

जिल्ह्यातील जि.प.च्या अनेक शाळांच्या खोल्या मोडकळीस आल्या आहेत. काहीचे छत खराब झाले आहेत तर काहीचे पत्रे उडून गेले आहेत. अशा प्रकाराच्या तक्रारी खा.मुंडे यांच्याकडे आल्या. त्यानंतर महिन्याभरापुर्वी याबाबत त्यांनी विशेष बैठक घेवून या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शाळा कायापालट समितीची स्थापना करीत अनेक बैठका घेतल्या. जिल्ह्यातील ३४४ शाळांच्या खोल्या दुरुस्त करण्यासाठी आढावा त्यांना देण्यात आला होता. त्यानंतर या समितीने योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या त्यांनी सुचना दिल्या होत्या आणि त्याचवेळी १ कोटी रुपयांचा निधी खासदार फंडातून या कामांसाठी दिला होता. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कायापालट समितीची बैठक खा.डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली.

३४४ शाळा खोल्या दुरुस्तीसाठी २.२५ कोटी रुपये लागणार म्हणून सांगून या ठिकाणी या बैठकीत केवळ १३७ शाळांसाठी ४ कोटी रु. जवळपास निधी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एवढी तफावत होती कशी? खोल्याची संख्या कमी आणि निधीची रक्कम जास्त कशामुळे होत आहे, असा प्रतिसवाल मुंडे यांनी अधिकाºयांना केला. उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, शिक्षणसभापती राजेसाहेब देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, मुरलीधर ढाकणे, गौतम नागरगोजे, संदिप ढाकणे, जयश्री मुंडे, राणा डोईफोडे, डॉ.अभय वनवे, भुषण पवार आदी उपस्थित होते.

नवीन शाळा खोल्यांसाठी निधी नाहीनवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी मोठा निधी दाखवण्यात आलेला आहे. मात्र नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी माझा निधी नाही आणि त्यासाठी मी निधी देणारही नाही.ज्या शाळा खोल्या नादुरुस्त आहेत यासाठी हा निधी मी देत आहे. त्यामुळे संरक्षण भिंत, नवीन शाळा खोल्या यासाठी हा निधी वापरू नये, ज्या अधिकारी, अभियंतानी या कामात ढिसाळपणा आणि गोंधळ घातला आहे, अशा अधिका-यांनी लेखी उत्तर पालकमंत्री, कायापालट समितीला द्यावे, असा दम त्यांनी यावेळी दिला. येत्या १० दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.