शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST

नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु ...

नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नसल्याची तक्रार करीत येथील दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून १ मार्च रोजी गैरहजर असलेले सरपंच व ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. नांदुरघाटमध्ये प्रथमच दिव्यांगांनी हे आंदोलन केले.

उपबाजारपेठ असलेल्या नांदुरघाट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नामधून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे आहे. परंतु आजपर्यंत हा निधी मिळाला नसल्याची तक्रार आहे. मग ग्रामपंचायतीला आजपर्यंत आलेला कर, लिलावातून मिळणारे उत्पन्न, घरपट्टी, नळपट्टी, विद्युत कर, मालमत्ता व इतर करातून जमा होणारी रक्कम नेमकी गेली कुठे? नियमाप्रमाणे ५ टक्के रक्कम दिव्यांगांना का वाटप झाली नाही, असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष पप्पू नाळपे व दत्ता आंधळकर यांनी केला. याबाबत पाठपुरावा केला असता १ मार्च रोजी काही प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रमुखांनी दिले होते. मात्र, कुठलीही हालचाल न झाल्याने ४ मार्च रोजी सर्व दिव्यांग ग्रामपंचायतीमध्ये गेले. तेथे सरपंच व ग्रामसेवक दोघेही गैरहजर असल्याने आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन करून सरपंच व ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

ग्रामसेवकाची टाळाटाळ, सरपंच गेले जीपवर

दोन दिवसांपासून ग्रामसेवक फक्त येतोच म्हणतात. पण येत नाहीत. तर सरपंच म्हणाले, त्यांना जीप भाडे आल्याने ते येऊ शकत नाहीत. आमचे निवेदन स्वीकारायला कोणीच पदाधिकारी नसल्यामुळे आम्ही खुर्चीला हार घालून आंदोलन केले. लवकरच सर्व दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहेत.

- विशाल नाळपे, सर्कल अध्यक्ष, प्रहार संघटना.

ऑफिसचे काम असल्यामुळे केजला जाणे जरूरीचे होते. बीड येथून मी थेट केजला गेलो. नांदुरघाटला आल्यानंतर त्यांच्या निवेदनाचे पाहू.

- भगवान सिरसाट, प्रभारी ग्रामसेवक

नांदुरघाटमध्ये नोंदणीकृत ७७ दिव्यांग आहेत व काही लोकांची नोंद राहिली आहे. त्यांना कोणतेच काम होत नाही. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या करांमधून त्यांना थोडा फार आधार मिळू शकतो. परंतु तो देण्यास टाळाटाळ होत आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही न्याय मिळवून घेणारच.

- दत्ता आंधळकर, उपाध्यक्ष, प्रहार नांदुरघाट