शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

सरपंच, ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST

नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु ...

नांदुरघाट : ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांगांना देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नसल्याची तक्रार करीत येथील दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून १ मार्च रोजी गैरहजर असलेले सरपंच व ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. नांदुरघाटमध्ये प्रथमच दिव्यांगांनी हे आंदोलन केले.

उपबाजारपेठ असलेल्या नांदुरघाट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नामधून ५ टक्के निधी हा गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे आहे. परंतु आजपर्यंत हा निधी मिळाला नसल्याची तक्रार आहे. मग ग्रामपंचायतीला आजपर्यंत आलेला कर, लिलावातून मिळणारे उत्पन्न, घरपट्टी, नळपट्टी, विद्युत कर, मालमत्ता व इतर करातून जमा होणारी रक्कम नेमकी गेली कुठे? नियमाप्रमाणे ५ टक्के रक्कम दिव्यांगांना का वाटप झाली नाही, असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष पप्पू नाळपे व दत्ता आंधळकर यांनी केला. याबाबत पाठपुरावा केला असता १ मार्च रोजी काही प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रमुखांनी दिले होते. मात्र, कुठलीही हालचाल न झाल्याने ४ मार्च रोजी सर्व दिव्यांग ग्रामपंचायतीमध्ये गेले. तेथे सरपंच व ग्रामसेवक दोघेही गैरहजर असल्याने आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन करून सरपंच व ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

ग्रामसेवकाची टाळाटाळ, सरपंच गेले जीपवर

दोन दिवसांपासून ग्रामसेवक फक्त येतोच म्हणतात. पण येत नाहीत. तर सरपंच म्हणाले, त्यांना जीप भाडे आल्याने ते येऊ शकत नाहीत. आमचे निवेदन स्वीकारायला कोणीच पदाधिकारी नसल्यामुळे आम्ही खुर्चीला हार घालून आंदोलन केले. लवकरच सर्व दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहेत.

- विशाल नाळपे, सर्कल अध्यक्ष, प्रहार संघटना.

ऑफिसचे काम असल्यामुळे केजला जाणे जरूरीचे होते. बीड येथून मी थेट केजला गेलो. नांदुरघाटला आल्यानंतर त्यांच्या निवेदनाचे पाहू.

- भगवान सिरसाट, प्रभारी ग्रामसेवक

नांदुरघाटमध्ये नोंदणीकृत ७७ दिव्यांग आहेत व काही लोकांची नोंद राहिली आहे. त्यांना कोणतेच काम होत नाही. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या करांमधून त्यांना थोडा फार आधार मिळू शकतो. परंतु तो देण्यास टाळाटाळ होत आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही न्याय मिळवून घेणारच.

- दत्ता आंधळकर, उपाध्यक्ष, प्रहार नांदुरघाट