शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने दिला दिलासा; मृतसाठ्यातील माजलगाव धरण ९५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 19:46 IST

माजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ९ इंच पाणी पातळीची आवश्यकता 

माजलगाव : परतीच्या पावसाने मृत साठ्याबाहेर आलेले माजलगाव धरण मंगळवारी 95.50 टक्के भरले असून शहरासह बीड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीचा सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात झालेल्या बेमोसमी पाऊसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त राहिल्याने मंगळवारी  दुपारी धरणाच्या पाणी पातळीने  पंचानवी पार केली आहे. मागील दहा पंधरा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरण परतीच्या पावसावर भरले होते. यावर्षी हे धरण सप्टेंबर मध्ये जोत्याखाली २५  टक्के गेले होते. पावसाळा संपत आल्याने व पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात बेमोसमी  पाऊस झाल्याने धरणाची पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मंगळवारी  दुपारी धरणातील पाणी पातळी 95 टक्क्याला पार करून गेली आहे. आता हे धरण भरायला केवळ 18 सेमी एवढी पाणी पातळी वाढण्याची आवश्यकता आहे.

या धरणाची पाणी पातळी  मंगळवारी दुपारी चार वाजता 431.62 मीटर ऐवढी झाली आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मीटर पा्ण्याची आवश्यकता असते. धरणात आज रोजी 296 दलघमी उपयुक्त पाणी  साठा उपलब्ध आहे तर आवक 1412 क्युसेस ऐवढी असून पाणी साठा 438 दलघमी एवढा झाल्याची माहिती धरणाचे शाखाअभियंता बी.आर. शेख यांनी दिली.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीRainपाऊसBeedबीडFarmerशेतकरी