शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 4:40 PM

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती.

अंबाजोगाई (बीड): धनेगाव येथील मांजरा धरणाचे सहा दरवाजे आज बुधवारी (दि. ११) सकाळी ८ वाजता ०.२५ मीटरने उचलण्यात आले असून त्याद्वारे नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंत विसर्ग सुरु राहणार असून पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये एकूण ११.४७ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. १८ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरणा केल्यानुसार बुधवारी मांजरा धरणातून नदीवरील लासरा, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव या पाच बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लातूर लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली होती. 

त्यानुसार बुधवारी सकाळी ८ वाजता धरणाचे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उचलण्यात येऊन विसर्ग सुरु करण्यात आला. गुरुवारी सकाळी ८ पर्यंत विसर्ग सुरु राहणार असून पाच उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये एकूण ११.४७ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. याचा फायदा मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या नदीपात्राच्या दोन्ही काठावरील जवळपास २५ गावांना होणार आहे. या भागातील पाणी, जनावरांच्या पाण्याच्या व सिंचनाचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, पाणी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थ यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी