शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; आष्टी-शिरूरला तडाखा, नागरिकांनी रात्र जागून काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:55 IST

कोणी वाहून गेले तर कोणाला जीवदान; पावसाला शिरूरला तडाखा; घरात पाणी, पिकेही पाण्याखाली

बीड : मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाने आष्टी तालुक्यात हाहाकार माजवला होता. अनेकांचा जीव गेला होता, तर काहींना जीवदान देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रात्री झालेल्या पावसानेही पुन्हा हाहाकार माजवला. आष्टीसोबतच शिरूरलाही याचा फटका बसला. सिंदफना नदी पात्राला महापूर आल्याने बाजारपेठ पाण्याखाली गेली. अनेकांच्या दुकानात, घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. लोकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. हे पाणी ओसरत नाही तोच पुन्हा सोमवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. गेवराईसह इतर भागांत जोरदार पाऊस झाला. बीडमध्येही रविवारी रात्री झालेल्या पावसाने अनेक मार्गांवर पाणी साचले होते.

बीडमध्ये रस्त्यांवर पाणीबीड शहरातील अनेक भागात नाल्या नसल्याने आणि नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी रस्त्यांवर आले. धांडे नगरसह इतर भागातील लोकांना पाण्यामुळे ये-जा करणे बंद झाले होते. या भागातील लोकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसूनच आंदोलन केले. तसेच केएसके कॉलेजसमोरही नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. जालना रोडवरही पाणी रस्त्यावर आले. अनेक भागात दुकान, घरात पाणी शिरल्याने हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बीड पालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सोमवारी दुपारी पाणी आलेल्या भागांची पाहणी केली.

आतापर्यंत ७११.२ मिमी पाऊसबीड जिल्ह्यात जून ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत ७११.२ मिमी पाऊस झाला आहे, तर मागच्या वर्षी २१ सप्टेंबर रोजीपर्यंत ७०४ मिमी पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत १४५ मिमी अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने पर्जन्यमानाची आकडेवारी वाढत चालली आहे. मागच्या वर्षी जेवढा पाऊस सप्टेंबरपर्यंत झाला होता, तेवढाच पाऊस यंदा सुद्धा झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जिल्ह्यातील २९ मंडळांत अतिवृष्टीजिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील राजुरी मंडळामध्ये (८२.८ मिमी), पेंडगाव (७०.५ मिमी), मांजरसुंबा (९०), चौसाळा (९५.५), नेकनूर (६६.३), लिंबागणेश (१०७.३), येळंबघाट (६६.३), चऱ्हाटा (८२.८), पारगाव सिरस (८२.८), पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळामध्ये (७४.३), अंमळनेर (६७), आष्टी तालुक्यातील दौलावडगाव मंडळामध्ये (८०), धामणगाव (६७.५), डोईठाण (६७), धानोरा (६५.८), दादेगाव (६५.८), गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळामध्ये (७९.३), धोंडराई (८७.३), उमापूर (६७), चकलंबा (६७), रेवकी (७७.८), तलवाडा (११५.३), धारूर तालुक्यातील धारूर मंडळामध्ये (८६.८), शिरूर कासार तालुक्यातील शिरूर मंडळामध्ये (६७.३), रायमोहा (६८.८), तिंतरवणी (६७), ब्रह्मनाथ येळंब (६७.३), गोमळवाडा (६७), खालापुरी (६८.८ मिमी) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूमांजरा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० वाजता धरणाचे गेट क्रमांक १ आणि ६ हे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणाचे एकूण ६ दरवाजे सुरू असून, त्यातून मांजरा नदीपात्रात २०१५७.७७ क्युसेक (५७०.८८ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या पातळीनुसार विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच माजलगाव धरणाचेही सोमवारी सकाळी ११ वाजता ११ दरवाजे ०.५० मीटरने वाढवण्यात आले होते.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र