शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोबीला एक रुपयाचा भाव, काढायलाही परवडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. पात्रूड येथील शेतकऱ्याने शेतात कोबीची लागवड केली; परंतु कोबीला बाजारपेठेत किलोला केवळ एक रुपयाच भाव मिळत असल्याने ती काढायला देखील परवडत नसल्याने ही कोबी शेतातच सुकू लागली आहे.

माजलगाव - पात्रूड या रस्त्यावर पात्रूड येथील शेतकरी अशोक नारायणराव आगरकर यांची तीन एकर शेती आहे. या शेतीवर सहा व्यक्तींची उपजीविका भागवली जाते. वर्षानुवर्षे वडिलोपार्जित या शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. अशोक आगरकर हे आपल्या शेतात वांगी, कोबी, पालक, कोथिंबीर, भोपळा आदी भाजीपाल्याची पिके घेत असतात. यातून खर्च जाऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असे. मागील वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना असाच भाजीपाला, फळे फेकून द्यावी लागली होती. यावर्षी परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरण, तलाव, नद्या, नाले भरून वाहू लागले होते. पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव गडगडले. यामुळे शेतकऱ्यांना लागलेल्या भाजीपाल्यातून वाहतुकीचाही खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.

पात्रूड येथील शेतकरी अशोक आगरकर यांनी अर्धा एकर शेतात कोबीची लागवड केली होती. बाजारपेठ कोबीला एक रुपया किलो भाव असल्याने त्या कोबीच्या रोपांचाही खर्च निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने या कोबीला फवारणी देखील केली नाही. त्यामुळे या कोबीला मोठ्या प्रमाणावर कीड लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. याच बरोबर या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व कोथिंबिरीचीही लागवड केली होती. त्या दोन्हींलाही भावच नसल्याने व हातात पैसेच येत नसल्याने पुढील वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यास पडला आहे.

शेतकऱ्यांच्या पीक, भाजीपाल्याला भावच नसल्याने आता कधी शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन येणार, असा प्रश्न पडला आहे. यावर्षी शेतीतून आमचा खर्चच निघणे मुश्कील झाल्याने मुलांचे शिक्षण कसे करावे व काय खावे. यामुळे झोप उडाली आहे.

----अशोक आगरकर, शेतकरी

===Photopath===

280321\img_20210328_122640_14.jpg