शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

घाटनांदूर परिसरात विजेचा लपंडाव, अघोषित भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST

नृसिंह सूर्यवंशी घाटनांदूर : घाटनांदूर व परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून दिवसांतून शेकडो वेळा सतत वीजपुरवठा खंडित ...

नृसिंह सूर्यवंशी

घाटनांदूर : घाटनांदूर व परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून दिवसांतून शेकडो वेळा सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. या ठिकाणी अघोषित भारनियमन होत असल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होत आहे .वास्तविक पाहता वीजबिल वसुली शून्य टक्के असतानाही लोडशेडिंग का करण्यात येत आहे? हा प्रश्नच आहे. ग्राहक वाढले, कनेक्शन वाढले मात्र नवीन ट्रान्सफार्मर अद्याप देण्यात आलेला नाही. शेकडो वेळा वीज गायब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये फक्त एकच पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर असून, लोड वाढला की सर्रास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. गत पाच वर्षांपासून आणखी एका पाच एमव्हीए ट्रान्सफार्मरची मागणी करण्यात येत आहे. ट्रान्सफार्मर बसवण्यासाठीचे स्ट्रक्चर उपलब्ध आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. कुठेच भारनियमन नसताना घाटनांदूर येथे मात्र नियमित लोडशेडिंग होत असून, त्याचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे.

येथील ३३ के. व्ही. सबस्टेशन अंतर्गत पूस, घाटनांदूर, हातोला असे तीन फिडरमधून वीजपुरवठा होतो. शेतीसाठी वरील तीनही फिडरला एका आठवड्यात रात्री, तर दुसऱ्या आठवड्यात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा होतो. जेव्हा जेव्हा थ्री फेज लाइट दिली जाते त्यावेळी दुसऱ्या फिडरला सिंगल फेज वीजपुरवठा अपेक्षित आहे. मात्र तसे न करता चक्क वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येतो. अनेक तासांचे सक्तीचे भारनियमन करण्यात येत आहे. पुरेशी वीज मिळत नसल्याने मजुरांना शेतात कामाला जावे का दळण आणण्यासाठी, पाणी भरण्यासाठी घरी थांबावे? असा यक्ष प्रश्न पडला आहे.

याबाबत तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित असून, लोडशेडिंग बंद होणे गरजेचे आहे. या संदर्भात अंबाजोगाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता कायमस्वरूपी अभियंता दिला असून, लोडशेडिंग बंद करू व कर्मचारी मुख्यालयी राहणे सक्तीचे करून तत्काळ नवीन पाच एमव्हीए ट्रान्सफार्मरसाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.