शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एक हत्या टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:03 AM

करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.

ठळक मुद्देपेठ बीड खून प्रकरण : शेजारणीला संपवून बायकोच्या हत्येसाठी निघाला होता खुनातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : करणीच्या संशयावरुन शेजारणीला संपवल्यानंतर पत्नीलाही संपविण्यासाठी निघालेल्या अशोक जंगले या आरोपीला पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. १० मिनिटेही उशीर झाला असता तर तो पसार होऊन पुण्यात जाऊन आपल्या पत्नीचीही हत्या करणार होता. हा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची हत्या टळली आहे.शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) या महिलेचा शेजारीच राहणाऱ्या अशोक जंगले याने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बतईने गळा चिरुन हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होऊन बीड तालुक्यातील इरगाव येथे आपल्या काकाच्या गावी गेला. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो पाडळशिंगीकडे पायी निघाला. हायवेला पोहोचून तो पुण्याला जाणार होता. १० मिनिटांवर हायवे असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केले. २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी वेळोवेळी तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बी. एस. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. कैलास लहाने यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी, हत्यार व अशोकचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत.दरम्यान, शीलावती यांनी घरावर करणी केली. त्यामुळेच आपला संसार उद्धवस्त झाला. यातूनच अशोकने शीलावती यांची हत्या केली. पत्नी अंजली जंगले ही आपल्यासोबत नांदत नसल्याने तो संतापला होता. शीलावती यांची हत्या करण्यापूर्वी सकाळी त्याचे अंजलीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला संपविण्याची फोनवरुन धमकीही दिली होती. मात्र, अंजलीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर काही तासांनीच अशोकने शीलावती यांचा काटा काढला. अंजलीची हत्या करण्यासाठी तो पुण्याकडे निघाला होता. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे अंजलीचा जीव बचावला. हा सर्व प्रकार तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.अंजली मुलांसोबत असते पुण्यातअंजली व अशोक यांना दोन मुले आहेत. दोघातील वादांमुळे अंजली पुण्यात राहत होती. केटरींगचे काम करुन ती उदरनिर्वाह भागवत होती. अशोकला अंजलीचा पत्ता माहीत होता. शनिवारी रात्री तो पुण्याला जाणार होता. रागाच्या भरात तिची हत्या करणार होता, असे सूत्रांकडून समजते.२४ तासात ३ खुनांमुळे हादरला होता बीड जिल्हाशनिवारी अवघ्या २४ तासात तब्बल ३ खुनांमुळे जिल्हा हादरला होता. याच दिवशी चौथाही खून होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो टळला. या तिन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखून