शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Video : दुष्काळात सुखद धक्का ; २४ फुटांवर विहिरीला पाणी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:37 IST

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून विहीर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

ठळक मुद्देबोअरला देखील ५०० ते ७०० फूट खोल घेऊनही पाणी लागत नाही. ९ वर्षांनी घेतला मुलांनी पोहण्याचा आनंद

- प्रभात बुडूख   

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील संतोष बलभीम जगताप या शेतकऱ्याच्या विहिरीला भर दुष्काळात अवघ्या २४ फुटांवर पाणी लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून विहीर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे. विहिरींचे पाणी आटलेले आहे. अशा परिस्थितीत विहिरीला पाणी लागत नाही. बोअरला देखील ५०० ते ७०० फूट खोल घेऊनही पाणी लागत नाही. मात्र, पालसिंगण येथील शेतकरी संतोष जगताप हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे विहीर तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर रोजगार हमी योजनेमधून विहिरीचे काम सुरु केले. सुरुवातीला खडक लागल्यानंतर ओलसर माती लागली नंतर २४ फूटावर काम सुरु असताना मोठा पाण्याचा झरा लागला. त्यानंतर इंजिनच्या साहाय्याने पाणी उपसा करुन ३० फूटापर्यंत विहीर खोदली आहे. पाणी टिकते का हे पाहण्यासाठी दोन दिवस इंजिन सुरु ठेऊन पाणी उपसा केला मात्र, त्यानंतर देखील विहिरीचे पाणी वाढतच होते.

पोहण्याचा आनंद२०१० पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात दुपारी पोहायला जाणे हा नित्यनियम होता. परंतु सततच्या दुष्काळामुळे विहीरी आटल्यामुळे पोहणे बंद झाले होते. मात्र, संतोष यांच्या विहिरीला पाणी लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर मुलांनी पोहण्याचा आनंद ९ वर्षांनी घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून गावात कोणाच्याही विहिरीला एवढ्या मोठ्या व कमी खोलीवर पाणी लागलेले नाही. त्यामुळे खूप आनंद होत आहे.- संतोष बलभीम जगताप, शेतकरी, पालसिंगण 

 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडdroughtदुष्काळFarmerशेतकरी