शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

नवीन वसाहतींमध्ये पक्के रस्ते तयार करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या ...

पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव

विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात पक्के रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड, गीत्ता रोड, शेपवाडी परिसर, मोरेवाडी परिसर, जोगाईवाडी परिसर, लगत नवीन वसाहत सिल्वर सिटी, बनाईनगर, शिक्षक वसाहत, राधानगरी, पिताजीनगरी व विविध अपार्टमेंट व रोहाऊस यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे व मोठ्या वसाहती निर्माण झाल्या. लाखो रुपये खर्च करून नागरिकांनी घराचे बांधकाम केले, तर अनेकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून घरे विकत घेतली. वसाहतींची निर्मिती झाल्यानंतर या परिसरात पक्के रस्ते होतील अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांना होती. मात्र, पाच ते सात वर्षांचा कालावधी लोटला तरीही या परिसरात अजूनही नाल्या, रस्ते, पथदिवे या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

या भागातील रस्ते अतिशय कच्चे असून, त्यांची दैनावस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही या भागातील रस्त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या वसाहतीमध्ये राहणारे महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक शाळेत जाणारी मुले-मुली चिखलातून गटारीच्या पाण्यातून मार्ग काढून ये-जा करतात. या भागातील परिसर काळ्या मातीचा असल्याने चिखल मोठ्या प्रमाणात होतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची डबकी साचली आहेत. चिखलामुळे रस्ते निसरडे होतात. परिणामी दुचाकी वाहनेही चालवता येत नाहीत. या रस्त्याने चालणेही मोठ्या जिकिरीचे बनते. दुचाकी घसरून या परिसरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

ना नाल्या, ना रस्ते ना पथदिवे, अशा गैरसोयीमुळे या भागातील रहिवाशांना आदिवासी वस्त्यांप्रमाणे राहण्याची वेळ आली आहे. या परिसरातील रहिवाशांनी अनेकदा एकत्रित येऊन लोकसहभागातून मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले. मात्र, झालेल्या मोठ्या पावसाने टाकलेला मुरूमही वाहून गेल्याने या भागाची दयनीय अवस्था झाली आहे. या निर्माण होणाऱ्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने रहिवाशांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे.

कर भरूनही सुविधा नाहीत

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. अनेक वर्षांपासून या भागात राहत असताना ग्रामपंचायतीने अद्यापही या भागात सुविधा दिलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील रहिवाशांचे हाल होतात. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नाही. नियमित कर भरूनही जर भौतिक सुविधा मिळत नसतील तर उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

230721\20210715_010641.jpg

नवीन वसाहती कडे जाणारा रस्ता