शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

नवीन वसाहतींमध्ये पक्के रस्ते तयार करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या ...

पायाभूत सुविधांचाही मोठा अभाव

विविध समस्यांमुळे रहिवासी त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात पक्के रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोड व वाघाळा रोड, गीत्ता रोड, शेपवाडी परिसर, मोरेवाडी परिसर, जोगाईवाडी परिसर, लगत नवीन वसाहत सिल्वर सिटी, बनाईनगर, शिक्षक वसाहत, राधानगरी, पिताजीनगरी व विविध अपार्टमेंट व रोहाऊस यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे व मोठ्या वसाहती निर्माण झाल्या. लाखो रुपये खर्च करून नागरिकांनी घराचे बांधकाम केले, तर अनेकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून घरे विकत घेतली. वसाहतींची निर्मिती झाल्यानंतर या परिसरात पक्के रस्ते होतील अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांना होती. मात्र, पाच ते सात वर्षांचा कालावधी लोटला तरीही या परिसरात अजूनही नाल्या, रस्ते, पथदिवे या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

या भागातील रस्ते अतिशय कच्चे असून, त्यांची दैनावस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही या भागातील रस्त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या वसाहतीमध्ये राहणारे महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक शाळेत जाणारी मुले-मुली चिखलातून गटारीच्या पाण्यातून मार्ग काढून ये-जा करतात. या भागातील परिसर काळ्या मातीचा असल्याने चिखल मोठ्या प्रमाणात होतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची डबकी साचली आहेत. चिखलामुळे रस्ते निसरडे होतात. परिणामी दुचाकी वाहनेही चालवता येत नाहीत. या रस्त्याने चालणेही मोठ्या जिकिरीचे बनते. दुचाकी घसरून या परिसरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

ना नाल्या, ना रस्ते ना पथदिवे, अशा गैरसोयीमुळे या भागातील रहिवाशांना आदिवासी वस्त्यांप्रमाणे राहण्याची वेळ आली आहे. या परिसरातील रहिवाशांनी अनेकदा एकत्रित येऊन लोकसहभागातून मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविले. मात्र, झालेल्या मोठ्या पावसाने टाकलेला मुरूमही वाहून गेल्याने या भागाची दयनीय अवस्था झाली आहे. या निर्माण होणाऱ्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने रहिवाशांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे.

कर भरूनही सुविधा नाहीत

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. अनेक वर्षांपासून या भागात राहत असताना ग्रामपंचायतीने अद्यापही या भागात सुविधा दिलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात या भागातील रहिवाशांचे हाल होतात. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नाही. नियमित कर भरूनही जर भौतिक सुविधा मिळत नसतील तर उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

230721\20210715_010641.jpg

नवीन वसाहती कडे जाणारा रस्ता