शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:56 IST

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.

बीड - जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून दिलं जाईल, असे म्हणत पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. एक महिला जेव्हा राजकारणात येते, तेव्हा काही लोकांना बाटलीत बंद ठेवायची गरज असते, तर काहींना बाटलीतून बाहेर काढायची गरज असते. आता, एक महिला व बालकल्याणमंत्री म्हणून मला ते चांगल समजतंय, असेही पंकजा यांनी पुढे बोलताना म्हटले.  

शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. तसेच जिल्हा रुग्णालयात महिला व शिशू विभागासाठी 100 खाटांची नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड नगर पालिकेसाठी 2 टप्प्यात 495 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

पंकजा यांनी आपल्या भाषणात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला, तसेच राष्ट्रवादीचे दोन गट पाडले. त्या राष्ट्रवादीत आणि या राष्ट्रवादीत. बीड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात विकास करायचा सोडून केवळ राजकारण करण्याच काम त्या राष्ट्रवादीनं केलं. बीड जिल्ह्यानं डझनभर आमदार दिले. पण, बीड जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही, साधी पंचायत समितीची इमारत उभी करण्यासाठीसुद्धा निधी मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 495 कोटी रुपयांचा निधी दिला. 

पूर्वीच्या काळात फक्त कागदावर रस्ते व्हायचे. स्वत:चे बगलबच्चे पोसण्याचं काम यापूर्वी झालंय. आता, सगळ ऑनलाईन आहे, टेंडर ऑनलाईन निघतात. त्यामुळे कुणालाही पोसण्याच काम आमच्याकडून होत नाही. केवळ, लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचं काम आम्ही करतो, असेही पंकजा यांनी म्हटले. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचं स्वप्न गेल्या 70 वर्षांपासून होतं. या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. या रेल्वेसाठी 2800 कोटी रुपये मंजूर झाले. 

बीड जिल्ह्यात महामार्गाच काम सुरू आहे. 6 हजार कोटींचे महामार्ग बीड जिल्ह्यात होत आहेत. तब्बल 950 किमीच्या लांबीचे हायवे बीड जिल्ह्यात होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा मोठी प्रगती करतोय, असेही पंकजा यांनी म्हटलं. दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळ असून पाऊस पडला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला, असे म्हणत पंकजा यांनी मुख्यमंत्र्याचेही कौतुक केले.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड