आष्टीतील ऑक्सिजन प्लांट जनतेसाठी वरदान ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:08+5:302021-05-25T04:37:08+5:30
आष्टी : कोरोनासारख्या परिस्थितीत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेला ऑक्सिजन प्लांट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार ...

आष्टीतील ऑक्सिजन प्लांट जनतेसाठी वरदान ठरणार
आष्टी :
कोरोनासारख्या परिस्थितीत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेला ऑक्सिजन प्लांट तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केले.
आष्टी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार आजबे बोलत होते. कोरोना विषाणूचा तालुक्यात प्रकोप सुरू आहे. या परिस्थितीत कोरोनाग्रस्त नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा तत्काळ होण्यासाठी पहिला ऑक्सिजन प्लांट उभा राहत आहे. यासाठी २ कोटी ४ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईच्या ईकेव्ही एंटरप्रायजेस कंपनीला काम देण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, माजी जि.प. अध्यक्ष शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, सुनील नाथ, संदीप अस्वर, परमेश्वर शेळके, भाऊ घुले, रामकृष्ण बांगर, सोनाली येवले, अधीक्षक डाॅ. राहुल टेकाडे उपस्थित होते.
यावेळी भीमसेन धोंडे म्हणाले, ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन झाले आहे. लवकरात लवकर काम होऊन ऑक्सिजननिर्मिती सुरू होईल. यामुळे तालुक्यातील रुग्णांनी आता ऑक्सिजनअभावी रेफर करण्याची गरज नाही. तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याने पालकांनी सर्दी, खोकला मुलांना जाणवल्यास तत्काळ उपचार घ्यावेत.
आष्टी शहरातील आयटीआय काॅलेजमध्ये फक्त लहान मुलांच्या उपचारांसाठी ५० बेडची सोय करण्यात येणार आहे, असेही आमदार आजबे यांनी सांगितले.